मोबाईल कंपन्यांची एका महिन्यात ६ हजार कोटींच्यावर कमाई; सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री
विश्वास निकम
कोलाड : दैनंदिन जीवनात महत्वाचा मानल्या जाणाऱ्या मोबाईल रिचार्जच्या दरात ५० ते ६० रुपयांची वाढ झाली असून हि वाढ सर्वसामान्य जनतेला न परवडणारी असुन त्यांचे सर्व बजेट कोलमडले आहे. यामध्ये विविध मोबाईल कंपनीच्या रिचार्जमधून ६ हजार कोटींच्यावर फायदा कंपनींना होणार असल्याचे दिसून येत असुन सर्वसामान्य जनतेच्या खिशाला कात्री लागली आहे.
एक वेळ जेवण नसले तरी चालेल परंतु मोबाईल असणे सर्वसामान्यांपासुन धनवान लोकांपर्यंत फार गरजचे मानले जात असले तरी या मोबाईलच्या रिचार्ज वाढीमुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. अगोदर विज बिलात ७.५० टक्के वाढ, कांदा, टोमॅटो, इतर भाजीपाला यांच्या दरात प्रचंड वाढ झाल्यानंतर आता या महिन्यापासून मोबाईल रिचार्जमध्ये ५० रुपयांपेक्षा जास्त वाढ झाल्याने सर्वसामान्य जनतेला याचा फटका बसत आहे.
भारताची लोकसंख्या ही १४४ कोटी असुन यामध्ये साधारपणे १२० कोटी लोकांकडे मोबाईल आहे. याचा विचार केला असता मोबाईल रिचार्ज कंपनीकडून ५० रुपये वाढविण्यात आले असुन याचा अर्थ मोबाईल कंपनीचा ६ हजार कोटी रुपये फायदा झाला आहे. तसेच काही व्यक्तींकडे दोन दोन मोबाईल असतात, या दरवढीमुळे एक मोबाईल बंद करण्याची पाळी या मोबाइलधारकांवर आली आहे. “बहीण माझी लाडकी” ही महिना १५००. रुपयांची योजना लाडक्या भावाकडून वसूल केली जात असल्याचा प्रकार दिसून येत आहे असे जनतेतून बोलले जात आहे.