• Thu. Jun 26th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

अदानी फाउंडेशन दिघी पोर्ट लिमिटेड आणि हेल्पेज इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने मोबाईल हेल्थ केअर युनिटचे उद्घाटन

ByEditor

Jul 13, 2024

अभय पाटील
बोर्ली पंचतन :
अदानी फाउंडेशन दिघी पोर्ट लिमिटेडच्या माध्यमातून ग्रामपंचायत दिघी येथे मोबाइल हेल्थ केअर युनिट उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता. हा सोहळा मुख्यत्वेकरून गावकऱ्यांना गाव पातळीवर आरोग्य सुविधा मिळावी तसेच मोफत औषध सर्वांना मिळावी याकरिता मोफत फिरता दवाखाना उपक्रम अदानी फाउंडेशन दिघी पोर्ट लिमिटेड आणि हेल्पेज इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तसेच दीप प्रज्वलन करुन करण्यात आली.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे दिघी ग्रामपंचायतचे सरपंच विपुल गोरिवले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नारायणकर, हेल्पेज इंडिया डायरेक्टर राजेश्वरी चौधरी, वेलेरियन पैस महाराष्ट्र प्रमुख, दिघी पोर्ट लिमिटेडकडून कॅप्टन राघवेंद्र राघव मरीन हेड, कर्नल चंदर देव संब्याळ, मानव संसाधन विभागप्रमुख संदीप कदम, कोळी समाज अध्यक्ष किरण कांदेकर, मुस्लिम समाज उपाध्यक्ष सलील अंतुले, बौद्ध समाज अध्यक्ष राजेश कासारे, अदानी फाउंडेशन डेप्युटी प्रोजेक्ट मॅनेजर जयश्री काळे, अवधूत पाटील उपस्थित होते.

राजेश्वरी चौधरी यांनी हेल्पेज इंडिया अतिशय दुर्गम भागात जाऊन गाव पातळीवर कशा प्रकारे आरोग्य सुविधा प्रदान करते याबद्दल विस्तृत माहिती दिली. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संतोष यांनी अदानी फाउंडेशन दिघी पोर्ट लिमिटेड कंपनीकडून अतिशय स्तुत्य उपक्रम राबविला जात आहे आणि सर्वांनी या आरोग्य सुविधेचा लाभ घ्यावा असे सांगितले. संदीप कदम दिघी पोर्ट लिमिटेड यांनी दिघी पोर्ट लिमिटेड सदैव गावकऱ्यांच्या सेवेशी तत्पर असून आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा गाव पातळीवर प्रदान करण्यात येईल असे मनोगत व्यक्त केले.

चंद्रमणी मोरे यांनी हा उपक्रम सतत सुरू रहावा तसेच नवनवीन आणखीन उपक्रम हाती घ्यावे अशी विनंती केली. किरण कांदेकर यांनी शुभेच्छा प्रदान करत आधारभूत सुविधांवर विशेष भर द्यावा अशी विनंती केली. वेलेरियन पैस यांनी सर्व टीमची ओळख करून देत सहकार्य करण्याचे आवाहन केले. हेल्पेज इंडिया सदैव आरोग्य सुविधेसाठी तत्पर राहील असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयश्री काळे यांनी केले तर आभार प्रदर्शन अवधुत पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्राम सखी नम्रता दिघीकर, सुप्रिया चव्हाण, प्रज्ञा कासारे यांनी अथक परिश्रम घेतले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!