• Sun. Jun 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

पावसाळ्यात ” ऍलर्जीचा ” सामना करताना

ByEditor

Jul 16, 2024

रायगड जनोदय ऑनलाईन
पावसाळा सुरु झाला कि, वेगवेगळ्या आजारांना आमंत्रण मिळत. त्यातीलच एक आजार म्हणजे ऍलर्जी. ऍलर्जी झाल्यावर पूर्ण अंगावर लाल गांधी उठतात. आणि अंगाला खूप खाज येते. अशावेळी काय करावे कळत नाही. त्रस्त करणाऱ्या या ऍलर्जीसाठी योग्य आहार घेतला तर यावर नियंत्रण येऊ शकते. त्यामुळे तुम्ही जर ऍलर्जी संबधी आजारांनी त्रस्त असाल तर आपल्या आहाराकडे नीट लक्ष द्या. जेणेकरून ऍलर्जी आटोक्यात येईल.

ऍलर्जीचा सामना करताना कोणती काळजी घ्याल

१) यावर घरगुती उपाय करताना आमसुले पाण्यात भिजवून ते पाणी अंगाला लावा. आराम मिळेल.

२) पित्त झाल्यावर करंज तेल चोळावे. त्यामुळे त्वचेचा कोरडेपणा जातो.

३) पोट साफ नसले तरी पित्त होते. त्यामुळे पोट कसे साफ राहील याची काळजी घावी.

४) ऍलर्जी झाल्यावर खोबरेल तेल कोमट करून अंगाला लावा.

५) चहा, कॉफी, दही, लोणचं, खारट पदार्थ खाऊ नये. याने पित्त आणखी वाढेल.

६) या आजरासाठी काही लोक सिट्रिझिन नावाची गोळी घेतात. या गोळी मुळे पित्त लगेच कमी होते. पण या गोळीमुळे किडनीचे आजार उद्भवतात. त्यामुळे ही गोळी घेण्यापेक्षा घरगुती उपाय करा.

७) शीतपित्त झाल्यावर धने आणि खोबरे खाल्याने अंगावरच्या गांधी लगेच जातात.

८) जिरे खाल्यानेही पित्त लगेच कमी होते. कारण जिरे हे उष्णता कमी करतात.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!