• Sun. Jun 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

पावसाळ्याच्या दिवसात अवश्य करा मॉर्निंग वॉक, कारण जाणून आनंदी व्हाल

ByEditor

Jul 22, 2024

रायगड जनोदय ऑनलाईन
मॉर्निंग वॉकसाठी पावसाळा हा सर्वोत्तम काळ आहे. हवामान खेळकर असते आणि एक-दोन पावसाच्या सरी तुमचा अनुभव अधिक आनंददायक बनवतात. पावसाळ्यात मॉर्निंग वॉक का आवश्यक आहे त्याची ६ कारणे जाणून घेऊ या.

ताजी हवा :
पाऊस पडल्याने हवेतील बहुतेक अशुद्धता धुऊन जाते. वायू प्रदूषणाची पातळी आटोक्यात असते. हवा ताजी असल्याने लाभ होतो.

वजन कमी करा :
पावसातील स्वादिष्ट जंक फूड वजन आणि कमरेची जाडी वाढवते. पावसाळ्यात मॉर्निंग वॉक केल्याने कॅलरी बर्न होतात. सकाळी लवकर मेटाबॉलिज्म गती मिळते.

स्नायूंची ताकद :
पावसामुळे घरात दिवसभर सोफ्यावर बसून राहावे लागते. अशावेळी स्नायूंना व्यायाम आवश्यक असते. चालणे या बाबतीत मदत करू शकते. सकाळी नियमित चालण्याने स्नायूंची ताकद सुधारते. पोटरी, हॅमस्ट्रिंग, हात आणि पाय यांना फायदा होतो.

हृदयाचे आरोग्य :
हृदय निरोगी ठेवण्यासाठी नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे. मॉर्निंग वॉक आणि त्या वेळी दीर्घ श्वास घेणे हृदयासाठी चमत्कार करू शकते. यामुळे रक्ताभिसरण सुधारते. हृदय मजबूत होते.

चांगली झोप :
चांगली झोप हवी असेल तर सकाळी चालायला हवे. नियमित मॉर्निंग वॉक
झोपेचे चक्र नियंत्रित करते. सकाळी लवकर व्यायाम करण्याचा थेट संबंध गाढ झोपेत घालवलेल्या वेळेशी असतो.

तणाव प्रतिबंध :
पावसाळ्यातील ताज्या वातावरणात केलेले मॉर्निंग वॉक तणाव दूर करते.
मॉर्निंग वॉकमुळे एकूणच मानसिक आरोग्यावर खूप चांगला परिणाम होतो.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!