• Sun. Jun 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

सकाळी उपाशी पोटी पाण्यासोबत घ्या ‘ही’ एक गोष्ट! पोट साफ होईल, रोगप्रतिकारशक्तीही वाढेल

ByEditor

Aug 6, 2024

रायगड जनोदय ऑनलाईन
सध्या पावसाळा सुरु आहे. पावसाळ्यात विविध आजार तोंड वर काढतात. त्यामुळे स्वतःला निरोगी ठेवणे मोठं कठीण काम असतं. कारण या दिवसांमध्ये आपली रोग प्रतिकारक क्षमतादेखील काहीशी मंदावलेली असते. त्यामुळे स्वतःच्या आणि कुटुंबाच्या आरोग्याची थोडी जास्तच काळजी घ्यावी लागते. शिवाय अन्नाच्या व्यवस्थित पचन न झाल्याने अनेकांना पावसाळ्यात पोटाच्या विविध तक्रारी सुरु होतात. त्यामुळेच अनेक लोक रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी आणि पोटाच्या तक्रारी दूर करण्यासाठी विविध औषधांचा आधार घेतात. मात्र असे करण्याची काहीच गरज नाही. कारण आपल्या घरामध्ये अशी एक गोष्ट आहे. ज्यामुळे एक रुपयाही खर्च न करता तुमची रोगप्रतिकारकशक्ती तर वाढेलच शिवाय तुमच्या पोटाच्या तक्रारीही दूर होतील. ही गोष्ट इतर कोणती नसून लिंबू होय.

लिंबू हा असा पदार्थ आहे जो भोजनाचा आस्वाद तर वाढवतोच शिवाय आरोग्याला विविधप्रकारे फायदेही देतो. सकाळी उठल्याबरोबर अनेक लोक उपाशी पोटी पाणी पितात. उपाशी पोटी पाणी पिणे ही चांगली गोष्ट आहे. परंतु जर तुम्ही या पाण्यात लिंबू पिळून पिलात तर तुमच्या आरोग्याला दुप्पट फायदा मिळेल. सकाळी रिकाम्या पोटी लिंबू पाणी प्यायल्याने तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढते. आणि पोटाशी संबंधित अनेक समस्यांपासून आराम मिळतो. अनेक औषधी गुणधर्मांनीयुक्त असलेले लिंबू तुमच्या त्वचेचे आरोग्यही सुधारू शकते. शरीराला डिटॉक्स करण्यासाठी हा घरगुती उपायदेखील मानला जाऊ शकतो. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, रिकाम्या पोटी लिंबू पाणी पिल्याने तुम्हाला मोठे फायदे मिळू शकतात.

पचनक्रिया सुधारते

रिकाम्या पोटी लिंबू पाणी प्यायल्याने तुमची पचनक्रिया सुधारते. लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे पित्त, ऍसिडिटी कमी करतात आणि अन्न पचन करण्यास मदत करतात. याचे सेवन केल्याने अपचन, बद्धकोष्ठता इत्यादी समस्यांपासून आराम मिळतो. त्यामुळे रोज सकाळी लिंबू पाणी पिण्याची सवय फायदेशीर ठरू शकते.

बॉडी डिटॉक्स

आपल्या शरीराला ठराविक वेळेत डिटॉक्सीफाय करणे आवश्यक असते. जेणेकरून आपल्या शरीरात साचलेले विषारी घटक शरीरातून बाहेर निघावेत. लिंबू पाणी हे नैसर्गिक डिटॉक्सिफायर आहे. हे शरीरातील विषारी घटक काढून टाकण्यास मदत करते. यामुळे यकृत आणि मूत्रपिंडाचे कार्य सुधारते. दररोज सकाळी रिकाम्या पोटी लिंबू पाणी पिऊन तुम्ही तुमचे शरीर डिटॉक्स करू शकता.

रोगप्रतिकारक वाढवते

पावसाळ्यात आपली रोगप्रतिकारक शक्ती काहीशी कमी झालेली असते. अशात आपली इम्युनिटी बूस्ट करणे गरजेचे असते. लिंबू पाण्यात व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते. ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. व्हिटॅमिन सी आपल्या रोगप्रतिकारक शक्तीसाठी खूप महत्वाचे आहे. लिंबू पाणी प्यायल्याने पावसाळ्यात व्हायरल इन्फेक्शन टाळता येते.

वजन कमी करते

लिंबू पाण्याचे नियमित सेवन वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. लिंबू पाणी पचनक्रिया सुधारते आणि पोटावरील चरबी कमी करण्यास मदत करते. त्यात कमी कॅलरी असते. ज्यामुळे वजन कमी करण्याची प्रक्रिया अगदी जलद आणि सहजरित्या होते.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!