• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

मधुमेह आणि वजन नियंत्रित ठेवण्यासाठी भात बंद करणे योग्य आहे का? जाणून घ्या तज्ज्ञांकडून

ByEditor

Aug 10, 2024

रायगड जनोदय ऑनलाईन
जेवणामध्ये भात खायला जवळपास सर्वांनाच आवडतो. पण जेव्हा मधुमेह नियंत्रणात आणायचा असेल किंवा वजन कमी करायचे असेल तर तेव्हा सर्वात आधी भात खाणे बंद केले जाते. पण भात खाणे बंद करणे हे खरच आरोग्यासाठी योग्य आहे का? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेलच. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. दीक्षा भावसार यांनी भात खाण्यावर काय सल्ला दिला आहे हे सांगणार आहोत…

मधुमेह, वजन कमी करण्यासाठी भात खाऊ शकता का?

तज्ञांचे उत्तर होय असे आहे. जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल, वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल, पीसीओएसने त्रस्त असाल किंवा हवामानामुळे समस्यांनी त्रस्त असाल तर तुम्ही भात खाऊ शकता. मात्र प्रमाणात खाणे गरजेचे आहे.

तांदूळ ग्लूटेन फ्री असतात

तांदळात कार्बोहायड्रेट्स भरपूर प्रमाणात असतात, म्हणूनच ते पचायला सोपे असते. यामुळे शरीराला झटपट ऊर्जा मिळते. याशिवाय तांदूळ ग्लूटेन-मुक्त असतो आणि त्यात लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन बी सारखे अनेक आवश्यक पोषक घटक असतात. त्याचबरोबर तांदळात सोडियमचे प्रमाण कमी असते आणि उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्या लोकांसाठी हे खूप चांगले असते.

आयुर्वेदात पचनावर लक्ष दिले जाते

आयुर्वेदात अन्नाचे सहज पचन होण्यास खूप महत्त्व दिले आहे. जेणेकरून आतड्यांमधून रक्तात आणि तेथून शरीराच्या पेशींमध्ये पोषक द्रव्यांचे शोषण सुधारता येईल. तांदळाचा भात बनवण्यापूर्वी त्यात पाण्याचे प्रमाण वाढवून त्यांची पचनक्षमता वाढवण्याचा सल्ला आयुर्वेदात दिला आहे.

तांदूळ भाजून घेणे

तांदूळ भाजण्यामुळे धान्याच्या पृष्ठभागावरील विविध स्टार्चची रचना बदलते आणि त्यातील काही कॅरेमेलाइज होऊन तांदळात चव वाढते. भाजून स्टार्च कमी झाल्यावर तांदळाचा चिकटपणा कमी होतो आणि तो चांगला फुलतो.

उकडून खाणे

तांदूळ भाजल्यानंतर बराच वेळ पाण्यात ठेवू शकता. त्यानंतर त्या तांदळामध्ये पुरेसे पाणी घाला. त्यानंतर चवीसाठी त्यात हळद घालून मीठ घाला. असे केल्याने भाताची चव वाढते.

पाणी गाळून काढणे

तांदूळ शिजवताना त्यात भरपूर घाला. त्यानंतर तांदूळ शिजल्यावर त्यातील पाणी गाळून घ्यावे. हे पाणी तुम्ही इतर गोष्टींसाठी वापरू शकता. हा भात तुम्ही डाळ किंवा कढीसोबत खाऊ शकता.

अशा प्रकारे मर्यादित प्रमाणात भात खाल्ल्यास अनेक समस्या टाळता येतात. जर तुम्ही योग्य प्रमाणात भात खाल्लात तर तुमच्या शरीरातील साखरेची पातळी वाढणार नाही. तसेच यकृतही निरोगी राहते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

(Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी.)

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!