• Thu. Jun 26th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

ग्रामीण रायगड जिल्हा सहा आसनी मिनिडोअर संघटनेतर्फे जिल्हाधिकारी किशन जावळे यांना निवेदन

ByEditor

Aug 11, 2024

विश्वास निकम
कोलाड :
एक वर्षांपासून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी एसटी प्रवासामध्ये महिलांना सरसकट ५०% सवलत देऊन सवलतीचा ठराव पास केला. त्याचा परिणाम गेली २० वर्षे मिनिडोअर रिक्षा चालवणाऱ्या गोरगरीब रिक्षा चालकांवर झाला. कारण एसटी महामंडळाला सरकार वर्षाला २५० कोटी रुपये देत असल्यामुळे रिक्षा व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला आहे.

दिवसभर १२ तास मेहनत करूनही त्यांना ३०० रुपये मिळत नाही. यामुळे रिक्षाचालकांवर कर्जाचा बोजा वाढत आहे. यामुळे अपुऱ्या पैशा अभावी मुलांना उच्च शिक्षणापासुन वंचित रहावे लागत आहे. रायगड जिल्ह्यातील रिक्षाधारक आर्थिक व मानसिक तणावात आहेत. याला जबाबदार सरकार आहे. म्हणून संघटनेचे अध्यक्ष प्रफूल्ल भगत, जयराम खाडे, डॅनी महाराज यांच्या नेतृत्वाखाली रोहा, वडखळ, माणगाव, नागोठणे, श्रीवर्धन,पोयनाड, खोपोली, अलिबाग संघटनेतर्फे रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांना निवेदन देण्यात आले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!