रामदास कदमांची मंत्री रवींद्र चव्हाणांवर घणाघाती टीका
मुंबई : महायुतीतील नेत्यांमधील वाद संपता संपत नसल्याचे चित्र आहे. अशातच आता मुंबई-गोवा हायवेच्या मुद्यावरून रामदास कदमांनी थेट सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना लक्ष्य केलं. त्यामुळे महायुतीतील (Mahayuti) वाद थेट मुद्यावरून गुद्यावर पोहोचलाय. अर्थात हे वाद काही नवीन नाहीत. या वादांची एक मालिकाच आहे. दरम्यान, यासाऱ्याचा परिणाम नेमका काय होणार? राज्यासह कोकणातील वातावरण कसं ढवळून निघणार? हे आगामी काळात बघणे महत्वाचे ठरणार आहे. तर आज रामदास कदमांनी एबीपी माझाशी बोलताना सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे आता हा वाद कुठवर जातो, हे ही पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
रामदास कदमांच्या या विधानांमुळे महायुतीत वादाची ठिकणी पडलीय. अर्थात हि ठिणगी काही पहिल्यांदाच पडतेय असं नाही. सत्तेत असलेल्या महायुतीत मागील काही दिवसांपासून हे वारंवर घडतंय. त्यामुळे पहिला प्रश्न महायुतीत खरंच सारं आलबेल आहे का? असा निर्माण होतोय. कदमांच्या या विधानानंतर रवींद्र चव्हाण यांनी काही प्रसारमाध्यमांशी बोलताना थेट रस्त्यावर समोरासमोर येण्याची भाषा केली. पण, त्यानंतर मात्र चव्हाणांनी युती धर्माचा दाखला देत अधिक भाष्य करणे टाळलंय.
मुंबई-गोवा हायवेच्या मुद्यावरून महायुतील दोन नेत्यांमध्ये जुंपली
प्रादेशिक पक्ष संपवून फक्त भाजपलाच मोठे व्हायचं आहे का? असा सवाल त्यांनी भाजपला केला होता. 2009 सालात गुहागरचे भाजपचे बंडखोर उमेदवार विनय नातू यांच्यामुळे झालेला पराभव रामदास कदम यांच्या आजही लक्षात आहे. तर त्यामुळेच रामदास कदम आणि विनय नातू यांच्यातला स्थानिक स्तरावरचा संघर्ष वारंवार पहायला मिळाला आहे. डॉक्टर विनय नातू यांना गुहागरमधून विधानसभेची सीट दिल्यास आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये विनय नातू यांना निवडून येऊ देणार नाही, असा थेट इशारा रामदास कदम यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील भाजप आणि रामदास कदम यांच्यातील संबंध राजकीय दृष्ट्या अजिबात चांगले नाहीत. तर स्थानिक पातळीवर कोकणात देखील रामदास कदम आणि दापोली भाजप यांच्यामधला संघर्ष लोकसभा निवडणुकीमध्ये देखील वारंवार पहायला मिळालाय.