• Wed. Jun 25th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

उरण शहरात व द्रोणागिरी नोडमधील इमारतींना ‘ओसी’ आहे, पण पाणी नाही!

ByEditor

Aug 23, 2024

पाण्याच्या समस्येबाबत नगरपालिका व सिडको प्रशासनाचे नियोजन ‘शून्य’

घनःश्याम कडू
उरण :
उरण नगरपालिका 2025 पर्यंत शहराला पुरेल एवढा पाणीसाठा असल्याचा दावा करत आहे. मात्र विकसित होत असलेल्या नव्या इमारतींमध्ये पाण्याची टंचाई उद्भवली असल्याची तक्रार या परिसरातील नागरिक करत आहेत. इमारतींना पालिकेची व सिडकोची ओ. सी. असतानाही पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांमध्ये संताप आहे. एमआयडीसीची पाणी थकबाकी उरण नगरपालिकेकडे 40 कोटी रुपयांच्या वरती असल्याचे अधिकृत सूत्रांकडून समजते. उरण शहरातील व द्रोणागिरी नोडमधील टॉवरचे पाण्याच्या टँकरचे वार्षिक बील 50 ते 60 लाखांच्या घरात गेले आहे. त्यामध्ये रहात असलेल्या सदनिका धारकांची अवस्था केविलवाणी झाली आहे.

याबाबत नगरपालिका अथवा सिडको अधिकारी वर्ग आपला आर्थिक स्वार्थ साधत मोठमोठे इमारतींचे टॉवर उभारण्यास परवानगी देत सुटले आहेत. त्या इमारतींना पाणी पुरवठा कशा प्रकारे होणार यावर कोणतेही नियोजन नसल्याचे दिसते. त्यामुळे कोट्यवधी रुपयांची सदनिका खरेदी करून आपला स्टेटस जपणार्‍या रहिवाशांच्या नशिबी टँकरचा पाणीपुरवठा करण्यात आलेला पाणी पिण्याची दुर्भाग्य लाभले आहे. यावरर वास्तव्य करणारे रहिवासी अथवा कोणताच राजकीय पक्ष अथवा नेतेमंडळी आवाज अथवा रस्त्यावर उतरताना दिसत नाही. सर्वत्र पाणी समस्या गहन बनली असताना टँकरने पाणीपुरवठा करणारा ठेकेदार हा पाणी पुरवठा कुठून करतो हे मात्र गुलदस्त्यातच आहे. त्यामुळे काहींना साथींच्या आजाराने ग्रासले आहे. परंतु ’तेरी भी चूप, मेरी भी चूप अशी अवस्था व्हीआयपी स्टेटस जपणार्‍या रहिवाशांची झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. या परिसरात सध्या बड्या विकासकांच्या बहुमजली इमारती उभ्या राहत असून नव्याने सदनिका घेणार्‍या नागरिकांची पसंतीही या भागाला आहे. त्यामुळे साहजिकच इथे दिवसागणिक मोठ्या प्रमाणावर नागरीकरण होत आहे. मात्र शुद्ध पाण्यासाठी येथील रहिवासी असहि व्याकुळ असल्याची माहिती येथील स्थानिक नागरिक देत आहेत. असे असताना या प्रकरणात विकासक जबाबदार की पालिका, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम कायम आहे.

काही नव्याने उभ्या रहाणार्‍या इमारतीला सीसी आणि ओसी पालिकेने दिली आहे. मात्र या इमारतीत आवश्यकतेएवढा पाणीपुरवढा होत नाही. म्हणून नाइलास्तव येथील रहिवाशांना टँकरवर अवलंबून रहावे लागत आहे. मुख्य म्हणजे पालिका व सिडको ओसी देताना उपलब्धतेनुसार पाणी पुरवठा करेल, अशी हमी देते. उरण पालिकेकडे तर 2025पर्यंत पाणीसाठा असल्याचे पाणी पालिका दावा करते. मात्र प्रत्यक्षात इथल्या काही इमारतीं मधील नागरिकांना टँकरने पाणी येते. परिणामी पालिका आणि विकासाच्या भूमिकेबाबत गोंधळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याचे नागरिक सांगतात. यंदा भीषण पाणीटंचाई निर्माण झाली नसली तरी शहरातील काही परिसरात सर्वाधिक टँकर जात असल्याचे वास्तव उघड झाले होते.

उरणमध्ये सिडकोच्या माध्यमातून द्रोणागिरी नोडची निर्मिती सुरू आहे. त्याठिकाणी 10 ते 15 मजली टॉवर उभे राहिले आहेत. त्यातील सदनिका या कोट्यवधी रुपयांना ग्राहकांनी खरेदी करून त्यामध्ये वास्तव्य करण्यास सुरुवात केली आहे. परंतु सुसज्ज व्हीआयपी असलेल्या या सोसायटीना मात्र पाणीपुरवठा करण्याबाबत सिडकोने कोणतीच ठोस उपाययोजना केलेली दिसत नाही. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा प्लॅट परंतु पाणी टँकरचा पिण्याची पाळी उरण शहरातील व द्रोणागिरी नोडमधील काही मोठमोठ्या टॉवर्स मधील रहिवाशांच्या नशीबी आले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!