किरण लाड
नागोठणे : केएमजी विभाग मराठाआळीतील ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्ते सुभाष गायकर व राजेंद्र (बाबु) गायकर यांच्या मातोश्री पार्वती शंकर गायकर (८५) यांचे दि. १६ जुलै रोजी राहत्या घरी निधन झाले.
स्वभावाने शांत, प्रेमळ असणाऱ्या कै.पार्वती या मेहनती होत्या. त्यांना चार मुले व दोन मुली असा मोठा परिवार 3 आहे. प्रचंड कष्ट करुन त्यांनी आपल्या मुलांना चांगले शिक्षण दिले. प्रेमळ स्वभावाच्या कै. पार्वती गायकर यांच्या निधनाने केएमजी विभागावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, नातवंडे,जावई असा मोठा परिवार आहे. त्यांचे दशक्रिया विधी मंगळवार, दि. २५ जुलै रोजी तर उत्तरकार्य (तेरावा) शुक्रवार, दि. २८ जुलै रोजी मराठाआळी, नागोठणे येथे होणार आहेत.