
प्राध्यापक
आ. प्र. वि. महाविद्यालय, नागोठणे
8412991873
देशाचे उज्वल भविष्यासाठी राबणाऱ्या सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
आपण सतत कार्यरत राहून नवनवीन पिढी अत्यंत तलख व हूशार बनवून राष्ट्राचे जगात श्रेष्ठत्व शिद्ध केले आहे. सारे जग तरुणांचा व तंत्रज्ञान अवगत असलेला देश म्हणून आपल्याकडे पाहतो आहे. तरीही हाच शिक्षक विद्यार्थ्यांना आदरयुक्त वाटू नये यावर विचारमंथन व्हायला पाहिजे.
मागील आठवड्यात एक माजी पदवीधर विद्यार्थीनी महाविद्यालयात तिचे कागदपत्रे घेण्यासाठी आली होती. महाविद्यालयातिल संबधित कर्मचाऱ्यांना भेटून ती ऑफिसच्या बाहेर बसली होती. तेवढ्यात प्राचार्य बाहेर आले व त्या विद्यार्थींनीची विचारपूस करू लागले. या संवादादरम्यान विद्यार्थींनीने लगेच उभे राहावे असे अपेक्षित होते. पण प्राचार्य समोर उभे राहून बोलतात व आपण बसून बोलत आहोत याचे तिला अजिबात गांभीर्य मला दिसले नाही. प्राचार्य पुढे गेल्यावर मीच त्या विद्यार्थिनीला ऐकवले की, समोर प्राचार्य उभे राहून आपल्याशी संवाद साधताना सुद्धा आपण उभे राहिल्या नाहीत. मोठ्या व्यक्तींचा आदर ठेवायला हवा. तेव्हा त्या विद्यार्थिनीच्या लक्षात आले व ती उठून उभी राहीली. ती सॉरीही बोलली, पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. यावरून असे दिसून आले की, या पदवीधर झालेल्या विद्यार्थ्यांना आपण कसे वागायला पाहिजे हेच अजून अवगत झालेले नाही.
मागे सोशल मिडियावर एक गेट टु गेदरचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडिओमध्ये शिक्षकांविषयी असलेला आदर व्यक्त करण्यासाठी शिक्षकांनी त्यांना केलेल्या शिक्षेमुळे आज आपण या स्थानापर्यंत पोहोचलो हे पन्नास-पंचावन वयातिल सर्व सहभागी वर्गमित्र एका सहकारी शिक्षक मित्राकडून त्यांना मोठे करण्यात योगदान देणाऱ्या शिक्षकांच्यावतीने हातावर व पाठीवर छडीचा प्रसाद खाण्याचे प्रत्याक्षित करून व्यक्त केला होता. या वर्ग मित्रामध्ये शिक्षक, डॉक्टर, वकील, जज, कलेक्टर असी सर्व क्षेत्रात काम करणारी मंडळी होती. त्याक्षणी ते फक्त वर्गात शिकणारे विद्यार्थी होते.
पुर्वी भलेही मार्क जास्त मिळण्यासाठी स्पर्धा नव्हती, पण समाजात कसे वागावे, व्यवहार कसा करावा याचे प्रशिक्षण शाळेतून मिळत असे. आज पालकांनी आपला पाल्यांना यंत्रासारखे करून ठेवले आहे. त्यामुळे मुलांना पालकांच्या इशार्यावर नाचावे लागत आहे. मुलाने/मुलीने पुढे कोणत्या क्षेत्रात करीअर करावे हे पालक ठरवितात. शाळेतील शिक्षणाबरोबर त्यांना शिकवणी, नाच, क्रिकेट, चित्रकला, ज्युदोकराटे, इ. अशा एक ना अनेक बाबीमध्ये कार्यरत ठेवतात. त्यांचे अक्षरशः बालपण हिसकावुन घेतल्यासारखे वाटते. यामुळे ते विद्यार्थीना तेच निर्माण करू शकत नाहीत. या यांत्रमानवी युगात स्वतःला अपडेट ठेवावे लागत आहे, हे जरी खरे असले तरी विद्यार्थ्यांची संस्कारित पिढी घडतांना दिसत नाही. आपण शिकलेले रामायण महाभारतातील गुरू – शिष्य नाते कुठेही दिसत नाही. यामुळे आपण आजच्या पिढीला एकलव्याचे उदाहरण देऊन गुरूचे महत्त्व सांगू शकत नाहीत. विद्यार्थ्यांच्या मनात वेगळ्याच गुरूविषयी आदर आहे जे, शिक्षण मनोरंजक आणि माहितीपूर्ण बनवतात, जे विद्यार्थ्यांसाठी अपमानास्पद नसतात, आणि एकंदर मैत्रीपूर्ण आणि संपर्क साधणारे असतात, तेच गुरू नेहमीच आदरास्थानी असतात. जे शिक्षक विद्यार्थी वा विद्यार्थिनींचा आदर करण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न करतात त्यांना फक्त तिरस्कार आणि उपहासाला सामोरे जावे लागते हे स्पष्ट होत आहे. आज शिकवणे आणि शिकणे म्हणजे काय हे शिक्षक विसरत आहे.
आजचा विद्यार्थी काळाच्या पुढे चालायला बघू पाहात आहे. त्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता असणार्या वस्तू सर्व काही वाटायला लागले आहे. पण, कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे, मानवी एजंट दुसऱ्या मानवी विषयात ज्ञान निर्माण करू शकत नाही, परंतु केवळ सादर करू शकतो, पुन्हा सादर करू शकतो, व्यवस्थापित करू शकतो, ऑर्डर करू शकतो आणि शेवटी मसाले घालून मनोबल वाढवा एवढेच करू शकतो. यात शिकण्याची गरज असलेली सामग्री म्हणजे ‘भावना’ आपल्याला कुठेही दिसणार नाही. ही भावना निर्माण करण्यासाठी संवेदनशील शिक्षकांची विद्यार्थ्यांना गरज आहे. ज्ञान केवळ विद्यार्थ्याच्या मनात निर्माण केले जाऊ शकते, आणि काही वेळा यासाठी विद्यार्थ्याला लक्ष देण्याची आवश्यकता असते, काही वेळा त्याला विशिष्ट प्रमाणात चमक आवश्यक असते. परंतु ते विद्यार्थ्यामध्ये दिसते जेव्हा शिक्षक त्यावर मेहनत घेतो.
आजकाल मुलांना आधीच्या पिढ्यांपेक्षा जास्त स्वातंत्र्य मिळत आहे. शिवाय प्रगत तंत्रज्ञानाने त्यांचे जीवन प्रगत केले आहे. लहानपणापासून मोबाईल खेळणारी ही पिढी आहे. दृकश्राव्य माध्यमाद्वारे ते बऱ्याच गोष्टी शिकले आहेत. मग शिक्षक, जे प्रत्यक्षात विद्यार्थ्यांची काळजी घेतिल, त्यांना प्रोत्साहन देतील, अपमानास्पद वागणूक देणार नाहीत, पोषक वातावरण निर्माण करतील, काळाच्याबरोबर ठेवण्यासाठी प्रयत्न करतील तेच शिक्षक विद्यार्थ्यांना प्रिय व आदरणीय राहातील.