अनंत नारंगीकर
उरण : वनवासी कल्याण आश्रम कोकण प्रांत आणि आदिवासीच्यावतीने २५ सप्टेंबर १९३० झाली झालेल्या गौरवशाली चिरनेर जंगल सत्याग्रह लढ्यातील आदिवासी हुतात्मा नाग्या महादू कातकरी यांचा ९४वा हुतात्मा दिन चिरनेर आक्कादेवी माळरानावर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी पनवेल विधानसभा मतदार संघाचे कर्तव्यदक्ष आ. प्रशांत ठाकूर, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच भाजपाचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, तालूका अध्यक्ष रवि भोईर, वनवासी कल्याण आश्रमाचे तालूका अध्यक्ष मनोज ठाकूर, श्रीमती मिरा पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर, वनवासी कल्याण आश्रम जिल्हाध्यक्ष अविनाश म्हात्रे उपस्थित होते.

चिरनेर जंगलसत्याग्रहात देशाच्या स्वातंत्र्यासाठी आदिवासी समाजाच्या हुतात्मा नाग्या महादू कातकरी या विराने महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. उरण तालुक्यातील चिरनेर परिसरातील एकूण आठ शूरविरांनी आपले प्राणपणाला लावून जुलमी इंग्रज सत्तेविरोधात २५ सप्टेंबरचा लढा केला दिला आहे.त्यामध्ये आदिवासी समाजाचे नाग्या कातकरी यांनी आपल्या प्राणाची बाजी लावली. त्यांचा सार्थ अभिमान सर्वांना असल्याचे गौरोवोद्गार आमदार प्रशांत ठाकूर यांनी काढले.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते जनजाती समाजाच्या यावर्षी १० वी, १२वी, १५ वी पास झालेल्या गुणवंत जनजाती विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच वनवासी कल्याण आश्रमाच्या अनेक वर्षे कार्य करत असलेल्या जनजाती बांधवांचे सत्कार करण्यात आले. २५ सप्टेंबर जागतिक फार्मसिस्ट दिनाचे औचित्य साधून इंडीयन फार्मास्युटिकल असोसिएशन, बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी, उरण तालुका केमिस्ट अँड डीस्ट्रीब्यूटर्स असो. सलग्न सीडीएआरडी यांच्यावतीने मोफत नेत्र चिकित्सा शिबिर, औषधे सेवन मार्गदर्शन करण्यात आले. तसेच उपस्थितांना कृमिनाशक गोळ्या वाटप केल्या आणि औषध सेवन विषयी माहिती दिली गेली.

यावेळी वनवासी कल्याण आश्रम जिल्हा अध्यक्ष अविनाश म्हात्रे,जिल्हा सचिव रवींद्र पाटील, इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशनचे उपाध्यक्ष सतीश शहा, फार्मासिस्ट विजय घाडगे, फार्मासिस्ट सुरेशभाई शहा, फार्मासिस्ट सुरेशकुमार चौधरी, फार्मासिस्ट मनोज ठाकूर, फार्मासिस्ट उमाकांत पानसरे, बाळू घालवत, राजेश्वर घालवत, फा. विश्वनाथ पाटील, संदेश अतपाडकर, मदन गिरी, अभिनय पाटील आदी सदस्य उपस्थित होते. जिल्ह्यातील अनेक वाड्यावरील जनजाती बांधवांचे पारंपरिक नाचाचे सादरीकरण याठिकाणी करण्यात आले.
सदर कार्यक्रम प्रसंगी नाग्या कातकरी यांच्या नावाचा जयघोष करीत शेकडोच्या संख्येने कोकण प्रांतातील आदिवासी महिलांनी विविध प्रकारच्या वेशभूषा केल्या होत्या.हुतात्माच्या स्मृती जाग्या रहाव्या, नव्या पिढीला त्याचे महत्व आत्मसात व्हावे यासाठी दरवर्षी २५ सप्टेंबरला शासनाच्यावतीने उरण पोलिसांच्या मार्फत बंदूकीच्या तीन फैरी झाडून हुतात्म्यांना मानवंदना दिली जाते. तर संपूर्ण कोकण प्रांतातून आलेल्या आदिवासी महिलांनी पारंपारिक नाचांचे सादरीकरण करुन मान्यवरांना व उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. यावेळी उरण, पनवेल, पेण, अलिबाग तालुक्यासह रायगड, ठाणे, पालघर जिल्ह्यातील आदिवासी बांधव व महिलांनी मोठी उपस्थिती दर्शवून आदिवासी समाजाची एकजुट दाखविली आहे.