• Fri. Jun 27th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

जेएनपीएच्या गटारात कचऱ्याचे साम्राज्य

ByEditor

Oct 19, 2024

स्वच्छ भारत अभियानाचा सोनारी, करळ गावात उडाला बोजवारा

अनंत नारंगीकर
उरण :
जेएनपीए प्रकल्पग्रस्त असणाऱ्या सोनारी, करल गावांच्या वेशीवरील जेएनपीएने निर्माण केलेल्या नैसर्गिक पाणी निचरा होणाऱ्या नाल्यामध्ये कचऱ्याचे साम्राज्य दिसून येत आहे. त्यामुळे संपूर्ण नालाच तुंबून गेला असल्याने स्वछतेचा बोजबारा उडाला आहे. मच्छर, उंदीर, घुशीचा वावर वाढला असल्याने येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

जेएनपीए परिसरात प्रकल्पग्रस्त असणारी सोनारी, करळ ही गावे जेएनपीए-पनवेल, नवी मुंबईकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याला येत आहेत. गावातील पाणी निचरा होण्यासाठी जेएनपीएच्या माध्यमातून मुख्य गटाराची निर्मिती ही करोडो रुपये खर्च करून केली आहे. या गटाराच्या बाजूला हॉटेल, अनेक खाद्य पदार्थांची दुकाने, दारूची दुकानं आहेत. या दुकानांच्या लगत करल फाटा हा सर्वात मोठा रहदारीचा भाग असल्याने या ठिकाणी प्रवाशी मोठ्या प्रमाणात उभे असतात. मात्र, या गटारात बाटल्याचा खच निर्माण झाला असून मच्छरांचा प्रादुर्भाव वाढला आहे. वाढलेले मच्छर राहिवाशांना तसेच प्रवाशांना संध्याकाळच्या वेळी फोडून काढत आहे. तसेच या ठिकाणी मोठी दुर्गंधी पसरत असल्याने स्वच्छ भारत अभियानाची ऐसी की तैसी निर्माण झाली असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. एकंदरीत सोनारी व करळ ग्रामपंचायत हद्दीत स्वच्छ भारत अभियानाचा बोजवारा उडाला आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!