२२ हजार जैन साधू, साध्वीजी गवंतांना शासन संरक्षण मिळण्यासाठी निवेनाद्वारे केली मागणी
वैभव कळस
म्हसळा : जैन गणधर आचार्य श्री कुंथुसागरजी महाराज यांचे शिष्य आचार्य श्री कामकुमारनंदिजी मा.सा. यांचे ५ जुलै २०२३ रोजी चिकोडी गाव, जिल्हा बेळगाव, कर्नाटक येथून रात्री १० वाजता अपहरण करून त्यांची निर्घृण हत्या करून त्यांच्या देहाचे तुकडे तुकडे करण्यात आले. जैन साधूची हत्या करणे ही जैन समाजाने जपलेल्या अहिंसा, करुणा आणि धार्मिक सलोख्याच्या तत्वाचा अपमान आहे. या संपूर्ण घटनेने अहिंसावादी असलेल्या अल्पसंख्यांक जैन समाजावर खुप मोठा आघात झाला आहे.
या घटनेचा देशभरात तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे.म्हसळा तालुका जैन समाज संघटनेच्यावतीने घटनेचा जाहीर निषेध व्यक्त करून आरोपींना लागलीच अटक करून त्यांचेवर कडक कारवाई करण्यात यावी असे निवेदन म्हसळा तहसीलदार यांचे मार्फत शासनाला दिले आहे. देशात सर्वधर्म समभाव जोपासत शांती, सत्य आणि अहिंसेचा प्रचार करण्यासाठी जैन समाजाचे सुमारे २२००० साधू, साध्वीजी भगवंत संपूर्ण भारतात पायी भ्रमण करित असतात. या सर्व गुरुभगवंतांना शासनातर्फे संरक्षण मिळावे अशी मागणी जैन समाज अध्यक्ष सुरेश भूरमल जैन यांनी म्हसळा नायब तहसीलदार गणेश तेलंगे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे महाराष्ट्र व भारत सरकार मार्फत मिळावी यासाठी कळविले आहे. यावेळी त्यांचे समवेत कांतीलाल जैन, रणजीत जैन, अशोक जैन, महावीर जैन, राजेश जैन, तेजपाल जैन, राहुल जैन, विवेक जैन, कमलेश जैन,ललित जैन आदी मान्यवर उपस्थित होते.