निवडणूक अधिकाऱ्यांना द्यावा लागतो जबाब!
विश्वास निकम
कोलाड : विधानसभा निवडणूकीला चार दिवस राहिले तरी मतदारांना अद्यापही मतदान ओळखपत्र कार्ड मिळाले नसल्याची खंत मतदारांकडून व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे निवडणूक अधिकारी यांना मतदारांना जबाब द्यावा लागत आहे.
मतदान ओळखपत्रात अनेख त्रुटी दिसून येत आहेत. यामध्ये कोणाच्या नावात बदल, तर कोणाच्या फोटोत बदल, तर कोणाच्या वयात बदल झाल्यामुळे मतदारांना याचा जबाब निवडणूक अधिकारी यांना द्यावा लागत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत तर यावरून विविध ठिकाणी वाद होत असल्याचे दिसून येते. अनेक वेळा विविध त्रुटींविषयी फॉर्म भरूनही मतदान ओळखपत्र मिळत नाही.
प्रत्येक गावातील शिक्षकांनी मतदान ओळखपत्राच्या त्रुटी विषयी एका मतदाराचे तीन तीन वेळा फॉर्म भरूनही अद्यापही ओळख पत्र मिळाले नाहीत. यामुळे मतदार व निवडणूक अधिकारी यांच्यात वाद होतात. तरी शासकीय अधिकारी यांच्याकडून नवीन ओळखपत्र मिळत नाही याचा नाहक त्रास मतदार यांना भोगावा लागत असुन यामुळे वाद विकोपाला जातो. याला जबाबदार कोण? अशी संतप्त प्रतिक्रिया मतदारांकडून व्यक्त करण्यात येत आहे.