घन:श्याम कडू
उरण : गेट वेहून एलिफंटाकडे जाणारी बोट उलटली आहे. गेट वे ऑफ इंडिया जवळच्या समुद्रात ही दुर्घटना घडली आहे. बोटीत जवळपास 56 प्रवासी असल्याची माहिती समोर आली आहे. बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. यात तीन प्रवाशांचा मृत्यू झाला असून 21 जणांना वाचवण्यात यश आले आहे. याला अधिकृत दुजोरा मिळालेली नाही. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

घारापुरी ते गेटवे प्रवाशी बोट सेवा सुरू आहे. आज दुपारच्या वेळेस या प्रवाशी बोटीला दुसऱ्या बोटीने धडक दिल्याने सदर बोट बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली. सदर बोटीमध्ये ५६ प्रवाशी असल्याचे अधिकृत सूत्रांकडून समजते. त्यामधील २१ जणांना वाचविण्यात यश आले तर ३ जणांचा मृत्यू झाल्याचे समजते. मात्र याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. याबाबत तपास मोहीम युद्धपातळीवर सुरू आहे, त्यामुळे याची अधिकृत माहिती मिळाली नाही.

याबाबत पोलीस तपास सुरू असून काहींना जेएनपीए तर काहींना गेटवे या ठिकाणी आणले असल्याची माहिती न्हावा शेवा पोलिसांकडून समजली आहे. परंतु अधिकृत अशी माहिती तपास सुरू असल्याने मिळालेली नाही.