• Sun. Jun 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड जिल्ह्यात २०२५ला राजकीय भूकंप होणार?

ByEditor

Dec 26, 2024

विरोधी पक्ष अस्तित्वातच राहणार नाही -संजय (आप्पा) ढवळे

गौतम जाधव
इंदापूर :
देशात तसेच महाराष्ट्रात भाजप पक्षाचे वर्चस्व वाढत चालले असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अनेक लोकोपयोगी विकासात्मक ध्येय धोरण सरकारमार्फत राबवत असल्याने भाजप पक्षात मोठी वाढ होताना दिसत आहे. अशाच प्रकारे रायगड जिल्ह्यात देखील भाजपचे कमळ हे जोरदारपणे फुलत चालले असून २०२५ या नवीन वर्षामध्ये रायगड जिल्ह्यात यावेळी राजकीय भूकंप होणार असून राजकीय विरोधी पक्ष हा अस्तित्वातच राहणार नसल्याचे मोठे वक्तव्ये भारतीय जनता पार्टीचे माणगाव तालुका माजी अध्यक्ष तथा भाजपचे दक्षिण रायगड कमिटी सदस्य संजय (आप्पा) ढवळे यांनी गुरवार, दि. २६ डिसेंबर रोजी आपल्या कार्यालयात पत्रकारांशी बोलताना सांगितले.

संजय ढवळे यांनी पुढे बोलताना सांगितले की, रायगड दक्षिण जिल्हा असो वा उत्तर या दोन्ही भागात भाजप पक्ष गेल्या चार ते पाच वर्षापासून जोरदारपणे वाढत असून या जिल्ह्यात भाजप पक्षाच्या माध्यमातून अनेक विकासकामे मार्गी लागली आहेत. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या प्रभावशाली कामामुळे रायगड जिल्हात २०२५ या नवीन वर्षात मोठ्या प्रमाणात बदल घडणार असून कोणताच राजकीय विरोधी पक्ष हा अस्तित्वात राहाणार नसून फक्त भाजपाचे कमळच आणि कमळच रायगड जिल्ह्यात दिसणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आता २०२५ या वर्षात भाजप पक्षात कोण कोण पक्षप्रवेश करणार याकडे रायगडच्या जनतेचे लक्ष लागले असून जोरदार चर्चा देखील चालू आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!