• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

पुराच्या पाण्याचा शेती क्षेत्राला बसलाय चांगलाच तडाखा

ByEditor

Jul 27, 2023

नंदकुमार मरवडे
खांब :
गेल्या आठ ते दहा दिवसांपासून सतत कोसळत असलेल्या मुसळधार पावसाचा शेती क्षेत्राला चांगलाच तडाखा बसल्याने शेतकरी वर्गाला फार मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे.

या संततधार पावसाने यत्किंचीतही विश्रांती न घेता सतत बरसत राहिल्याने नदी-नाले तुंबून भरून वाहत असल्याने सर्वत्रच पूर आला आहे. तर सतत कोसळत असलेल्या पावसाच्या पाण्याचा निचरा न होता पाणी लागवड केलेल्या भातशेतीमध्ये तुंबूनच राहिले असल्याने गेल्या आठ दहा दिवसांपासून लागवडीचे क्षेत्रातील भातपीक कुजण्याचीची भीती व्यक्त केली जाऊ लागली आहे. सततच्या पावसाच्या मुसळधारेमुळे शेती क्षेत्रात पाणी तुंबले आहे. याशिवाय मुसळधार पावसाचा परिणाम होऊन शेतात मोठ्या प्रमाणावर गाळ जमा होऊन, बांध-बंदिस्तीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. एकंदरीत मुसळधार पावसामुळे शेती व शेतकरी वर्गाचे खुप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!