मुंबई : गेल्या काही वर्षात विविध खाड्यांमध्ये प्रदूषण वाढले आहे. प्रदूषणामुळे किनारा परिसरात आढळणाऱ्या विविध माशांच्या जातीही नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.त्यामुळे पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या मच्छिमारांना मत्स्य दुष्काळाची झळ सोसावी लागत आहे. महाराष्ट्रातील सातही जिल्ह्यात नद्या नाले-खाड्या येथून प्रदूषित पाणी, प्लास्टिक कचरा आणि घनकचरा समुद्रात आल्यामुळे संपूर्ण किनारपट्टीसह समुद्रात सहामैल पर्यंतचा समुद्र प्रदूषित झाला आहे. त्याचबरोबर या वाढत्या प्रदूषणामुळे मत्स्य दुष्काळ देखील वाढत आहे.
समुद्र प्रदूषणामुळे मत्स्य प्रजननावर गंभीर परिणाम होत आहेत. प्रदूषणामुळे समुद्रातील जीवन आणि पर्यावरणावर अनेक नकारात्मक परिणाम होतात, ज्यामुळे मत्स्यांची प्रजनन क्षमता कमी होऊ शकते. समुद्रातील मवाळ शेवाळ, वनस्पती, जैववैविधता सूक्ष्म जंतू नष्ट होत असल्यामुळे सागरी वातावरणात बदल घडत आहेत. समुद्रातील रासायनिक प्रदूषण, जसे की कीटनाशक, औद्योगिक कचरा, प्लास्टिक व इतर विषारी रासायनिक पदार्थ, मत्स्यांच्या प्रजननावर परिणाम करू शकतात. हे रासायनिक प्रदूषण शारीरिक आणि जैविक पातळीवर मत्स्यांवर हल्ला करते, ज्यामुळे अंडी अंडवलेली किंवा विकसित होणारी अंडी आणि लहान माशांची वाढ अडचणीत येते. समुद्रातील प्लास्टिक, रासायनिक प्रदूषण (जसे की कीटनाशक, औद्योगिक कचरा), आणि गाळ यामुळे समुद्रातील पर्यावरण बिघडत आहे. यामुळे माशांच्या अंडी आणि प्रजनन क्षमता कमी होऊ शकते. याचे परिणाम म्हणून मासे कमी होतात, ज्यामुळे मासेमारीचे उत्पन्न घटते.
रायगड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मासेमारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे काही मासेमारांनी आपल्या मासेमारी नौका आधुनिक मासेमारीस फिरवण्याची तयारी दर्शविण्याच्या मार्गावर आहेत. मासे कमी होऊन त्यांच्या पुनर्निर्माण क्षमता कमी होईल. जास्त मासेमारीमुळे काही माशांच्या प्रजाती लवकरच लुप्त होण्याची शक्यता आहे, आणि त्याच्या पर्यावरणीय संतुलनावर गंभीर परिणाम होईल. पूर्व सरकारने कित्येक तालुक्यात औद्योगिकीकरणाला चालना देण्यासाठी एमआयडीसीसारखे प्रकल्प, छोट्या मोठ्या कंपन्या, कारखाने स्थापित केले. येथील सांडपाणी प्रदूषित, अशुद्ध पाणी शुद्ध न करता तसेच प्लास्टिक कचरा सर्रास खाड्यांमार्फत समुद्रात येत असल्यामुळे समुद्र मोठ्या प्रमाणात प्रदूषित होत आहे. तसेच खार जमिनीही प्रदूषणामुळे उत्पन्नात मोठी घट होते. यामुळे कर्जबाजारी मासेमार देशोधडीला लागले आहेत.
काहींना मस्त्योद्योगाकरिता विदेशातून गुप्त रसद येत आहे. त्यात मत्स्य व्यवसाय मत्स्योद्योग बोट बांधणी हे प्रकार सर्रास रत्नागिरी व गुजरात येथील मंगलोर येथे राजरोस सुरु आहेत. त्यामुळे हे सरकार या प्रसंगाचा सहानुभूतीपूर्वक योग्य अभ्यास करून कोळी समाजास योग्य न्याय मिळवून देईल या आशेवर कोळी बांधव जगत आहे.
देशाच्या प्रगतीसाठी ओएनजीसी व नौदल व्यापारी जहाज यांच्या अवाढव्य जल वाहतुकीमुळे (CARGO CHANAL & NAVEL CHANAL) मत्स्यसाठा व मासेमारीचे उच्चाटन होत आहे. समुद्र स्वच्छ करण्याचे नियोजन न करता Blue Economic तसेच चिंतन शिबिर याचे स्वागतच पण मूलभूत समस्या आपत्तीजनक परिस्थितीकडे लक्ष केंद्रीत करून जगाच्या स्पर्धेत उतरणे हे आपल्या देशाचे महान कर्तव्यच आहे, याकरिता जपानचा आदर्श ठेवणे गरजेचे आहे.ही केंद्र व राज्य सरकारची जबाबदारी आहे. हे आपले सरकार योग्य अभ्यास करून कोळी समाजास योग्य न्याय देईल अशी आशा बाळगतो.
-गोरक्षनाथ रामचंद्र कोळी,
कुलाबा मुंबई