विनायक पाटील
पेण : मन्नत सामाजिक संस्थेच्या संस्थापक-अध्यक्षा मुस्कान झटाम यांना २०२५ चा ‘रायगड कोकणरत्न’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
कला, क्रिडा, सांस्कृतीक, शैक्षणिक, सामाजिक, अध्यात्मिक, वैद्यकीय अशा विविध क्षेत्रांमध्ये आपल्या कार्याचा ठसा उमठविणाऱ्या व्यक्तींना ‘रायगड कोकणरत्न’ पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. यावर्षी समाजिक कार्यामध्ये भरीव कामगिरी करणाऱ्या पेण येथील मुस्कान रफिक झटाम यांना २०२५चा ‘रायगड कोकणरत्न’ पुरस्कार देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले. मुस्कान झट्टाम या आपल्या मन्नत या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून गेली कित्येक वर्ष समाजोपयोगी व महिलांच्या सबलीकरणासाठी काम करत आहेत. शेकडो महिलांच्या हाताला रोजगार देऊन मुस्कान झटाम यांनी त्यांना स्वतःच्या पायावर उभे केले आहेत. त्यांच्या या कार्याची नोंद घेऊन त्यांना यंदाच्या “कोकणरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.