1 एप्रिलपासून एक्स्प्रेस-वेवरील टोलची किंमत वाढणार!
मुंबई : पुणे-मुंबई महामार्गावर नियमितपणे प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. येत्या 1 एप्रिलपासून मुंबई-पुणे महामार्गावरील टोल महागणार आहे. त्यामुळे मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांना अधिक पैसे खर्च करावे लागतील. 1 एप्रिलपासून पुणे-मुंबई महामार्गाच्या टोलमध्ये 3 टक्क्यांनी वाढ होणार आहे. जे मार्ग भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्या हद्दीतील असतील त्या मार्गांसाठी ही टोल वाढ लागू असेल.
सध्या होणारी वाढ तीन टक्के असल्याची माहिती प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिली. चारचाकीच्या एकेरी प्रवासावर पाच रुपयांची वाढ झाली असून, परतीचा प्रवास करताना चारचाकींसाठी 10 रुपये जास्तीचा दर आकारलेला आहे. अन्य प्रकारच्या वाहनांवर सरासरी 15 ते 20 रुपयांची वाढ होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
फास्टॅग सक्तीचा निर्णय
हायकोर्टाने फास्टॅग सक्तीला आव्हान देणारी याचिका फेटाळली असून, 1 एप्रिल 2025 पासून राज्यातील सर्व टोलनाक्यांवर फास्टॅग अनिवार्य होणार आहे. जर वाहनावर फास्टॅग नसेल, तर वाहनचालकांना दुप्पट टोल भरावा लागेल.