• Sun. Jun 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

महायुती सरकारचे 100 दिवसांचे रिपोर्ट कार्ड जाहीर; ‘या’ पाच मंत्र्यांनी बाजी मारली

ByEditor

May 1, 2025

मुंबई : महाराष्ट्रात महायुती सरकार सत्तेवर आल्यानंतर 100 दिवसांतील कामगिरीचे रिपोर्ट कार्ड आज महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने जाहीर करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरद्वारे 48 विभागांच्या कामगिरीचे गुण आणि टॉप परफॉर्मिंग मंत्रालयांची यादी शेअर करत संपूर्ण राज्यात एक नवा चर्चेचा विषय निर्माण केला आहे.

या अहवालात महिला व बालविकास विभाग, सार्वजनिक बांधकाम, कृषी, ग्रामविकास आणि परिवहन विभाग यांनी सर्वाधिक गुण मिळवत आघाडी घेतली. याशिवाय सर्वोत्तम महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त आणि विभागीय आयुक्तांचीही यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या कामगिरीच्या तपशीलवार अहवालानुसार खालील विभागांनी उत्कृष्ट कामगिरी करत टॉप 5 स्थान पटकावले आहेत:

महिला व बाल विकास विभाग – 80%
मंत्री: आदिती तटकरे

सार्वजनिक बांधकाम विभाग – 77.95%

कृषी विभाग – 66.15%
मंत्री: माणिकराव कोकाटे (Manikrao kokate)

ग्राम विकास विभाग – 63.85%

परिवहन व बंदरे विभाग – 61.28%

48 पैकी 12 विभागांनी 100% उद्दिष्ट पूर्ण केल्याचे फडणवीसांनी नमूद केले, तर 18 विभागांनी 80% पेक्षा अधिक कामगिरी बजावली.

सर्वोत्कृष्ट अधिकारी कोण? :

रिपोर्ट कार्डमध्ये केवळ मंत्री नव्हे, तर विविध क्षेत्रांतील वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांची कामगिरीही नमूद करण्यात आली आहे.

सर्वोत्तम महापालिका आयुक्त:

उल्हासनगर – 86.29%

पिंपरी चिंचवड – 85.71%

पनवेल व नवी मुंबई – 79.43%

सर्वोत्तम पोलीस आयुक्त:

मीरा भाईंदर – 84.57%

ठाणे – 76.57%

मुंबई रेल्वे – 73.14%

सर्वोत्तम विभागीय आयुक्त:

कोकण – 75.43%

नाशिक व नागपूर – 62.29%

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!