अनंत नारंगीकर
उरण : तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशीही वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडला. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून, नागरिकांना गर्मीपासून काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र, या अनपेक्षित पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली असून अवकाळी पावसाचा फटका हा जांभूळ आंबा पिकांना बसला आहे. विट व्यवसायिकांची एकच तारांबळ उडाली असून काही ठिकाणी विद्युत पुरवठा करणारे पोल पडल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला. तसेच झाडे उन्मळून पडली असून घरावरील कौले व पत्रे उडाल्याने रहिवाशांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
भाजीपाला, वाल, चवळी यांसह जांभूळ, आंबा बागांना मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास या अवकाळी पावसामुळे हिरावला गेल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. विट व्यवसायिकांची एकच तारांबळ उडाली असून काही ठिकाणी विद्युत पुरवठा करणारे पोल पडल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला. तसेच झाडे उन्मळून पडली असून घरावरील कौले व पत्रे उडाल्याने रहिवाशांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पावसामुळे उरण तालुक्यातील शेतकऱ्याचे मोठं नुकसान झाल्याने शासनाने या नुकसानीची दखल घेऊन मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
