• Tue. Jun 17th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड जिल्ह्यात एसटी महामंडळाचा अनागोंदी कारभार? चालत्या गाडीचे टायर आले बाहेर

ByEditor

Jun 16, 2025

मिलिंद माने
महाड :
रायगड जिल्ह्यातील एसटी महामंडळाचा कारभार अनागोंदी असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. बोरिवली-मुरुड एसटी बसचे टायर धावत्या बस बाहेर बाहेर आले, मात्र चालकाच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला. हि घटना मुरुड तालुक्यातील विहुर गावामध्ये घडली.

महाड तालुक्यात महाड-दापोली रोडवर एसटी महामंडळाच्या बसेसचा निसरड्या रस्त्यामुळे अपघात होण्याच्या घटना घडल्या असतानाच आज मुरुड तालुक्यात बोरीवलीहुन मुरुडला येणारी एमएच २० बीएल ३८०८ या क्रमांकाची बस विहुर गावाजवळ आली असता चालत्या बसच्या उजव्या बाजूचे मागील दोन्ही टायर बाहेर आले, मात्र चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अपघात होता होता वाचला.

रायगडात सत्ताधारी भाजपा व सत्ताधारी राष्ट्रवादी तसेच सत्ताधारी शिवसेना शिंदे गट यांचे आमदार व मंत्री असताना मात्र सर्वसामान्यांच्या एसटी वाहतुकीकडे सर्वच लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाल्याने एसटी बसेसच्या अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असताना एकही लोकप्रतिनिधी याबाबत आवाज उठविताना दिसत नसल्याचे पाहावयास मिळत आहे. आता पावसाळा चालू झाला आहे, त्यातच शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी दररोज शाळा, महाविद्यालयात ये-जा करणार असल्याने जर चालत्या बसमध्ये असा अपघात झाल्यास याला कोण जबाबदार? असा सवाल एसटी महामंडळातून प्रवास करणारे जिल्ह्यातील असंख्य प्रवासी सत्ताधाऱ्यांना विचारत आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!