विकासासाठी दत्तक घेतलेल्या खरसई गावासाठी ऊपलब्ध करून दिला ५० लाखांचा निधी
वैभव कळस
म्हसळा : मुबलक पाणी पुरवठा असलेल्या खरसई धरण योजने अंतर्गत म्हसळा तालुक्यातील तोंडसुरे प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेतील ८ गावे आणि ४ वाड्यासाठी जलजीवन मिशन योजने अंतर्गत ९६ लक्ष रुपयांची नवीन योजना मंजुर करण्यात आली आहे. योजनेच्या कामाला सुरुवात झाली असून खरसई ग्रामस्थ व ग्रामपंचायत प्रशासन यांचे गैरसमजुतीमधुन योजनेची मुळ विहिर करण्यास गेली दोन महिने ग्रामस्थांकडून विरोध होत आहे असे खासदार सुनील तटकरे यांच्या निदर्शनास आणून दिले असता तटकरे यांनी सार्वजनिक धरणाचे पाणी हे सर्वांसाठी ऊपलब्ध आहे त्याचेवर कोणाची मालकी हक्क अधिकार होऊ शकत नाही तरी अशा प्रकारे कोणी विरोध न करता सांमजस्याची भूमिका घेतली पाहिजे. शासकीय भूखंडावरील लोकपयोगी विकासकामांसाठी कोणी आडकाठी केल्यास कायदेशीर मार्गाने कारवाई केली जाईल अशा आदेश वजा सूचना खासदार सुनील तटकरे यांनी म्हसळा तालुका विकासकामांचे आढावा सभेत दिल्या. म्हसळा पंचायत समितीमध्ये संपन्न झालेल्या आढावा सभेत प्रांताधिकारी अमित शेडगे, तहसीलदार समिर घारे, गटविकास अधिकारी बाळासाहेब पोळ यांना सूचना दिल्या आहेत. या वेळी संसद ग्राम योजनेतून गाव विकासासाठी दत्तक घेतलेल्या खरसई गावाला ५० लक्ष रुपयांचा मंजुर निधीचे पत्र खरसई सरपंच व ग्रामस्थाकडे सुपुर्द केला.
विकास कामांमध्ये प्रामुख्याने खरसई येथे दिवाबत्ती सोय, बाजारकट्टे, अंतर्गत रस्ते व इतर सुखसोई करिता ३१ लक्ष रुपये, बौध्दवाडी स्मशानभूमी जवळ धर्मशाळा बांधकामासाठी रुपये ७.५० लक्ष, मुस्लीम मोहल्ला सामाजिक सभागृह बांधकाम रूपये ५ लक्ष आणि महादेव कोळी समाज धार्मिक विधी शेड उभारण्यासाठी ७.५ लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
म्हसळा तालुक्याचे सार्वजनिक विकासासाठी आवश्यक तेवढा निधी खासदार सुनिल तटकरे,माजी पालकमंत्री आमदार आदिती तटकरे आणि आमदार अनिकेत तटकरे यांच्या विकास निधिंतून मंजुर करण्यात आला आहे.असे असले तरी प्रत्यक्षात अनेक कामे अधिकारी व ठेकेदार यांच्या करवी प्रलंबीत असल्याची माहिती खासदार सुनिल तटकरे यांना दिली असता खासदार तटकरे यांनी महिन्या भरात दुसऱ्यांदा आढावा सभा घेतली.आयोजीत सभेत मंजुर विकास कामांचे पुर्ततेची माहिती घेतली असता संबंधित कामांचे ठेकेदार आणि अधिकारी वर्ग यांच्या हलगर्जी पणामुले मंजुर विकास कामे पुर्ण होण्यास विलंब होत असल्याचे निदर्शनास आले आहे.आढावा सभेत खासदार सुनिल तटकरे यांच्या समावेत तालुका अध्यक्ष समीर बनकर, माजी सभापती बबन मनवे, जिल्हा चिटणीस महादेव पाटील, नगराध्यक्ष असहल कादीरी, उपनगराध्यक्ष सुनिल शेडगे, मधुकर गायकर, संदीप चाचले, छाया म्हात्रे, मिना टिंगरे, महीला अध्यक्षा सोनल घोले, रेश्मा काणसे, शगुप्ता जहांगिर, सरपंच वेटकोळी, सरपंच प्रियंका निंबरे, मुख्याधिकारी मनोज उकिर्डे, सहा. अभियंता शेट्ये, मराविम अभियंता पटवारी, पं. स. कक्ष अधिकारी दिघीकर आदी अधिकारी मान्यवरांसह तालुक्यातील सरपंच, कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभेत मेंदडी धरण पाणी आटल्याने आजूबाजूच्या वारळ, काळसुरी, मेंदडी आणि मेंदडीकोंड वरील मोठ्या लोकवस्तीत प्रचंड पाणी टंचाई परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा वेळी पुढील उपाययोजना म्हणुन दास ऑफसर्स, रस्ते विकासक जे. एम. म्हात्रे आणि प्राधिकरण विभाग यांच्या मदतीने धरणातील गाळ काढण्याचे आदेश खासदार सुनील तटकरे यांनी म्हसळा तहसिलदार समीर घारे, गटविकास अधिकारी बाळासाहेब पोळ आणि पाणी पुरवठा अधिकारी यांना दिले आहेत.