• Tue. Jun 24th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

अवकाळी पाऊस व गारपीट नुकसानग्रस्तांचे पाहणीसाठी शिवसेना नेते शेतकऱ्यांच्या बांधावर दौरा करणार!

ByEditor

Nov 28, 2023

मिलिंद माने
मुंबई :
राज्यातील उत्तर महाराष्ट्र ,पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ ,कोकण. या भागात मागील काही दिवसापासून झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्यासह विनायक राऊत व अन्य नेते शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन 29 नोव्हेंबर पासून पाहणी करणार आहेत. राज्यातील उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ कोकण व या वेगवेगळ्या भागातील शेतकरी व बागायतदार यांना मागील काही दिवसापासून झालेल्या अवकाळी पावसाचा व गारपिटीचा फटका बसून कांदा, द्राक्ष ,मोसंबी, पपई, डाळिंब, टोमॅटो, कापूस, तूर, ज्वारी, हरभरा, गहू व भात यासारख्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदील झाला आहे. या शेतकऱ्यांना सरकारकडून मदत मिळण्यास होणारा विलंब होत असून तातडीने पंचनामे करण्यासाठी व शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून पक्षप्रमुखांच्या आदेशाने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करण्यास शिवसेना नेत्यांना आदेश देण्यात आले आहेत.

राज्यातील गारपीटग्रस्त व अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शिवसेना नेते पाहणी करणार आहेत त्यासाठी शिवसेना नेते व पक्षाचे सचिव खासदार विनायक राऊत हे नाशिक, इगतपुरी, त्रंबकेश्वर, डहाणू ,व पालघर या ठिकाणी भेट देणार असून त्यांच्या समवेत शिवसेना उपनेते व शेतकरी सेनेचे अध्यक्ष नितीन बानगुडे पाटील नाशिक जिल्हाप्रमुख विजय करंजकर नाशिक महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर इत्यादी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे छत्रपती संभाजी नगर, जालना, बुलढाणा ,या ठिकाणी भेट देणार असून त्यांच्या समवेत शिवसेना उपनेते व शेतकरी सेनेचे कार्याध्यक्ष लक्ष्मण वडले तसेच मराठवाडा शेतकरी सेनेचे अध्यक्ष वाशिम देशमुख इत्यादी पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून काढण्यात आलेल्या प्रसिद्ध पत्रकार स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. राज्यातील अवकाळी पावसामुळे पडलेल्या व गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्यासाठी शिवसेना नेते सज्ज झाले असताना दुसरीकडे राज्याचे मंत्री या निमित्त काय भूमिका घेतात यावर राज्यातील राजकारण तापणार असल्याचे दिसत आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!