अनंत नारंगीकर
उरण : नवी मुंबई, पनवेल परिसरात मुले बेपत्ता होण्याच्या घटना घडल्याचे वृत्त टिव्ही न्यूज चॅनलवरून दाखवल्यानंतर हि बातमी वाऱ्यासारखी जनमानसात पसरु लागली आहे. एकंदरीत पुन्हा एकदा नवी मुंबई, पनवेलमधून लहान मुले पळून नेणारी टोळी सक्रिय झाली असल्याची बाब समोर येत असल्याने उरण तालुक्यातील पालक वर्गात तणावाचे वातावरण पसरले आहे.
उरण, पनवेल तालुक्यात या अगोदर मुले बेपत्ता होण्याच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे शाळेत जाणाऱ्या लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यात नुकताच नवी मुंबई, पनवेल परिसरात मुले बेपत्ता होण्याची घटना घडल्याचे वृत्त टिव्ही न्यूज चॅनलवरून वाऱ्या सारखी जनमानसात पसरु लागली आहे. एकंदरीत पुन्हा एकदा लहान मुले पळून नेणारी टोळी सक्रिय झाली असल्याची बाब या घटनेतून समोर येत असल्याने उरण तालुक्यातील पालक वर्गात तणावाचे वातावरण पसरले आहे.
