वैशाली कडू
उरण : घारापुरी बेटावर वीज पुरवठा करणाऱ्या समुद्रातील दोन वाहिन्या खराब झाल्याने दोन फेजवर वीज पुरवठा आहे. त्यामुळे पाणी पुरवठा करणारा पंप वापरता येत नाही. त्यामुळे पाणी पुरवठा करणे शक्य नाही. त्यासाठी लवकरात लवकर सदरच्या वाहिन्या दुरुस्ती करून घारापुरी येथील वीज पुरवठा पूर्ववत करण्याची मागणी करण्यात आली.
याबाबतचे कार्यकारी अभियंता पनवेल यांना दिवेदन देण्यात आले. यावेळी सरपंच मीना भोईर, उपसरपंच बळीराम ठाकुर, सदस्यां अरुणा घरत, निता ठाकुर, हेमाली म्हात्रे, विकास म्हात्रे तसेच महावितरणचे पनवेल विभागाचे कार्यकारी अभियंता एस. ए. सरोदे, सहा. कार्यकारी अभियंता बईकर, ज्युनिअर इंजिनिअर रणजित देशमुख उपस्थित होते. यावेळी लवकरच सदरच्या समुद्रातील वीज वाहिन्या दुरुस्ती करण्यात येतील असे आश्वासन दिले आहे.