नाताळ सणानिमित्त कोकणात पर्यटकांची तुफान गर्दी
विश्वास निकम
कोलाड : शनिवार दि. २३ डिसेंबर ते सोमवार दि. २५ डिसेंबर २०२३ पर्यंत सुट्टी असल्यामुळे लाखो पर्यटक कोकणात निघाले असुन यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असुन यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.

शनिवार, रविवार व सोमवार नाताळनिमित्ताने सलग तीन दिवस सुट्टी असल्यामुळे कोकणात अलिबाग, काशिद बीच, मुरुड जंजिरा, श्रीवर्धन, हरिहरेश्वर, गणपतीपुळे, रायगड किल्ला, रत्नागिरी तसेच गोवा येथे जाण्यासाठी हजारो पर्यटक मुंबई, ठाणे, पुणे येथून कोकणात जाण्यासाठी निघाले असुन यामुळे शनिवार सकाळपासुनच वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत होत्या. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरु असल्यामुळे वाहतुकीसाठी विलंब होत असताना दिसत होता. यामुळे जागोजागी वाहतूक कोंडी निर्माण होत होती. यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने कोकणात येणाऱ्या पर्यटकांना कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये यासाठी रायगड पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला परंतु असे असले तरी कोरोना डोके वर काढत असल्यामुळे सर्व पर्यटकांनी काही नियम पाळावे असेही बोलले जात आहे.