विनायक पाटील
पेण : दहावी बोर्डाची परीक्षा हि विद्यार्थ्यांसाठी महत्वाची असते. कारण दहावीच्या बोर्डाची परीक्षा ही त्यांच्या करिअरला कलाटणी देणारी असते. हे लक्षात घेऊनच बोर्डाच्या परीक्षेत चांगले गुण मिळावेत याकरिता चिल्ड्रन्स फ्युचर इंडिया संस्थेच्यावतीने १० वीच्या प्रतिपालीत मुलांसाठी परीक्षेची पूर्व तयारी करण्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेमध्ये एकूण ७१ मुलांनी सहभाग घेतला.

या कार्यशाळेसाठी एस. एस. जाधव, प्रमोद झाल्टे आणि शिरीष कावरे या अनुभवी व तज्ञ शिक्षकांना बोलाविण्यात आले होते. या कार्यशाळेदरम्यान त्यांनी विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेची तयारी कशी करावी आणि चांगले गुण कसे मिळवावेत याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी मुलांनी त्यांच्यासाठी आयोजित केलेल्या या कार्यशाळेबद्दल अभिप्राय देताना म्हटले कि, या कार्यशाळेमुळे त्यांना अभ्यास करण्यास आणि परीक्षेची तयारी करण्यास खूप मदत होईल.