• Mon. Jun 30th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

विरोधक सत्तेशिवाय जगु शकत नाही, ते आता परत सत्तेत येणं अशक्य -आ. महेंद्र दळवी

ByEditor

Jun 24, 2023

३३ कोटींची २६ गाव पाणीपुरवठा योजना सहा महिन्यात पूर्ण होणार -आ. महेंद्र दळवी

वार्ताहर
रोहे :
मी आमदार होण्याआधी पासूनच या भागातील पाणी प्रश्नाची मला जाण होती. या आधीच्या सत्ताधाऱ्यांनी कुंडलिका डावा व उजवा तीर पश्चिम खोऱ्यातील गावांसाठी राबविण्यात आलेल्या योजनेचा आपल्या फायद्यासाठी पुर्ण बट्ट्याबोळ केला. मात्र, मी आमदार होताच या योजनेसाठी पुन्हा प्रयत्न करत असताना दुर्दैवाने सत्तेत आमच्या सोबत असतानाही निव्वळ मला याचे श्रेय मिळू नये यासाठी अनेक खोडे घालण्याचा प्रयत्न केला. अखेर विद्यमान मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांचे नेतृत्वाखाली झालेले क्रांतिकारक बंड व त्याला या विरोधकांच्या षडयंत्राला कंटाळलेले आम्ही रायगडचे तीन आमदार यांनी साथ दिल्यामुळे राज्यात सत्तांतर झाले. यामुळे रायगडमधील विरोधकांना सत्तेपासून दुर जावे लागले. यांनी आजपर्यंत सत्ता ही सर्वसामान्य जनतेसाठी न वापरता निव्वळ आपल्या परिवाराच्या हिताचाच विचार केला. आता सत्ता गेल्यामुळे यांचा तिळपापड होत रोज आमच्यावर टिका करत आहे. मात्र, आलेल्या सत्तेचा फायदा हा मी माझ्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या मार्फत सर्व सामान्यांचे मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी करत आहे. त्यामुळे विरोधकांनी कितीही प्रयत्न केले तरी ही योजना येत्या ६ महिन्यात पुर्ण होत विभागातील महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरविणारच असा आत्मविश्वास आमदार महेंद्र दळवी यांनी व्यक्त केला. यासोबतच रायगडमधील विरोधकांना सतत सत्तेत राहण्याची नशा लागलेली आहे. ते सत्तेशीवाय जगु शकत नाहीत. मात्र आता त्यांना पुन्हा सत्ता मिळणे अशक्य आहे असा टोला आ. दळवी यांनी विरोधकांनी लगावला. रोहे अलिबाग विधानसभा मतदारसंघातील डोंगरी येथे ३३ कोटींच्या २६ गाव पाणीपुरवठा योजनेचे वरुण राजाच्या साक्षीने झालेल्या भूमिपूजन सोहळ्यानंतर ते उपस्थितांना मार्गदर्शन करताना बोलत होते.

यावेळी जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर , राजा केणी, माजी जि. प. सदस्य बाळा तेलंगे , संजय म्हात्रे, रुपेश पाटील, संतोष निगडे, ऍड. मनोजकुमार शिंदे, उद्देश वाडकर, मंगेश रावकर, उस्मान रोहेकर, डॉ. प्रगती देशमुख, छाया पिंगळे, सायली सदावर्ते, मोतीराम गिजे, गणेश खरीवले, सुधाकर शिंदे, संदेश मोरे, जयवंत पोकळे, विकास पाटील आदिंसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तालुक्यातील व अलिबाग मतदारसंघातील कुंडलिका पश्चिम खोऱ्यातील गावे ही पाणी टंचाईचा सामना करत आहेत. या गावांसाठी २०११ साली २६ गाव पाणीपुरवठा योजना आघाडी सरकारच्या काळात राबविण्यात आली. मात्र ती योजना अनेकविध कारणांमुळे पुर्णतः अपयशी ठरली. अखेर रोहे शिवसेना तालुकाप्रमुख ऍड. मनोजकुमार शिंदे यांनी २०२२ मध्ये पुन्हा यासाठी प्रयत्न सुरु करत आ. महेंद्र दळवी यांचेकडे पाठपुरावा करून ग्रामीण पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचेकडून ही योजना नव्याने मंजूर करून घेतली. त्याचा भूमिपूजन सोहळा २४ जुन रोजी करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऍड. अविनाश भगत यांनी करताना आ. महेंद्र दळवी हे आमदार झाल्यापासून आजवर विकासापासून वंचित राहिलेल्या या भागात त्यांचे माध्यमातून होणाऱ्या विकासकामांवर प्रकाशझोत टाकला.

यावेळी आपल्या भाषणात आमदार महेंद्र दळवी पुढे म्हणाले की, गेले कित्येक वर्ष ही गावे पाण्यापासून वंचित राहिली. पूर्वीच्या योजनेचा प्रस्थापितांनी बट्ट्याबोळ केला होता त्यामुळे नवीन पाणी योजना मंजूर करण्याकरिता खूप त्रास झाला. कोणी किती दबाव टाकला तरी मात्र पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी सदर योजना मंजूर केली. त्यामुळे इथल्या नेत्यासारखे माझे काम नाही. आयुष्यभर पाण्याचे राजकारण करून मते मागायचे त्यातला मी नाही. त्यामुळे सदर पाणी योजना सहा महिन्यात सुरु होइल असे आश्वासन महेंद्र दळवी यांनी दिले.

देण्याची वेळ येते तेव्हा तटकरे कुणाची कदर करीत नाहीत. कारण यांनी आपल्या कुटुंबापलीकडे काही पाहिलं नाही. म्हणून  कार्यकर्त्यांचे लोंढेच्या लोंढे आमच्याकडे येत आहेत. कार्यकर्त्यांना माझे आवाहन आहे की, लोक तुमची वाट बघत आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचा गतिमान सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवा हे सर्वसामान्याचे सरकार आहे. तर २६ गाव पाणी योजनेत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी खीळ घातली होती. शंभर कोटीची पाणी योजने अठरा लाखावर आणली होती इतर गावे या योजनेतून वगळावीत असे पत्र त्यांनी दिले होते. पाण्यासारख्या पुण्याच्या कामात अडथळा आणण्याचे काम केले होते. मात्र महेंद्र दळवी यांनी पाणी योजना मंजूर करून जनतेला पाणी देण्याचे पुण्याचे काम केले ते इथल्या खासदार, आमदारांना जमले नाही असे वक्तव्य करत माझ्यावर टीका केली जाते कलाकोटवाला काय करेल परंतु, हाच काळाकोटवाला रोहा तालुक्याचे राजकारण ढवळून काढेल ते तुम्ही पाहाच असा इशारा ऍड. मनोज शिंदे यांनी राष्ट्रवादीला दिला.

सूत्रसंचालन प्रास्ताविक अविनाश भगत यांनी केले तर कार्यक्रमाप्रसंगी सुप्रसिद्ध गायिका संध्या मडवी, शाहीर शंकर जाधव यांच्या सुरेल आवाजाने उपस्थितांना मंत्रमुग्ध करून टाकले. सदर कार्यक्रम हा भव्य दिव्य असा केल्याने मनोजकुमार शिंदे यांचे आमदार दळवी यांनी कौतुक केले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!