अभय पाटील
बोर्ली पंचतन : अदानी समूह आपल्या सामाजिक उत्तरदायित्व छत्रछायेखाली अदानी फाउंडेशन माध्यमातून सामूहिक रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाला दिघी पोर्ट लिमिटेड चे अभियांत्रीक विभाग प्रमुख चिराग भिमानी, कर्नल अरविंद सिंह बेदी, एच आर हेड शैलेश सिंह, दिघी पोर्ट लिमिटेड चे कॅप्टन राघव, ऑपरेशन प्रमुख अरुल जीवा, पर्यावरण प्रमूख विलास शिर्के, अदानी फाउंडेशनच्या जयश्री काळे, दिघी पोर्टचे सौरभ सिंह, सिव्हिल हॉस्पिटल अलिबागचे डॉक्टर गोसावी आणि टीम, कामगार युनियन प्रमुख सूरज मांजरेकर, उपाध्यक्ष राजकुमार कोलथरकर, इंडियन कोस्ट गार्ड तसेच कमांडंट वाहीड आणि टीम उपस्थित होते. रक्तदान शिबिराचा प्रारंभ दीप प्रज्वलन करून करण्यात आला.

यावेळी विलास शिर्के यांनी आपल्या मनोगतात रक्तदान म्हणजेच जीवनदान. लोकांच्या अडचणी प्रसंगी धावून येणे, अपघात घडल्यास अत्यंत महत्वपूर्ण योगदान रक्ताचे असते. याकरिता रक्तदान महत्वाचे आहे. डॉक्टर गोसावी यांनी दर तीन महिन्यांनी रक्तदान आपण करू शकतो. आपल्याला शरीरातील रक्ताची पातळी रक्तदानामुळे शुद्ध होते. आपण कोणाचा तरी जीव वाचवतो हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा. दिघी पोर्ट लिमिटेडचे चिराग भिमनी यांनी रक्तदान प्रत्येक सुदृढ व्यक्तीने करायला पाहिजे. जेणेकरुन प्रसंगावधान लक्षात घेता रक्त कामी येईल. कोणाला तरी जीवदान देणे यापेक्षा मोठे कार्य कुठलेच नाही.
अदानी फाउंडेशन वरिष्ठ प्रकल्प अधिकारी यांनी रक्तदानाचे महत्व पटवून दिले. एकूण ४३ लोकांनी रक्तदान केले. अदानी फाउंडेशन माध्यमातून रायगड जिल्हा परिषद मराठी शाळा येथे चॉकलेट वितरण करून गौतम अदानी यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यामध्ये एक वेगळाच जल्लोष दिसून आला. अदानी फाऊंडेशनचे अवधूत पाटील यांनी विद्यार्थ्यांची सोबत टाळ्या वाजवून, गाणे गाऊन वाढदिवस साजरा केला. दिघी पोर्टचे सर्व कामगार बंधू आणि इंडियन कोस्ट गार्ड चे कमांडंट आणि कामगार बंधू सर्वांनी रक्तदान केले. दिघी सागरी पोलीस ठाण्याचे प्रसाद ढेबे आणि टीम यांनी सुध्दा रक्तदान केले.