घन:श्याम कडू
उरण : उरण विधानसभेतील पनवेल तालुक्यातील शिवसेनेच्या खानावले ग्रामपंचायत सरपंच जयश्री सुभाष नाईक यांची 11 फेब्रुवारी 2024 रोजी फसवणूक करून व पैशाचा आमिष दाखवून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करून घेतला होता, परंतु त्यांनी दि. 12 फेब्रुवारी 2024 रोजी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जिल्हाप्रमुख, माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पुन्हा एकदा असंख्य कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश करून घरवापसी केली. यावेळी माजी आमदार व जिल्हाप्रमुख मनोहरशेठ भोईर, पनवेल तालुका प्रमुख रघुनाथ मंगल पाटील यांनी या सर्व कार्यकर्त्यांना भगवी शाल अर्पण करून त्यांचे पुन्हा एकदा शिवसेनेत स्वागत केले.
यावेळी सरपंच तसेच विद्यमान सदस्य व गुळसुंदे जिल्हा परिषद संपर्कप्रमुख मोहन लबडे, सरपंच पोयंजे, पनवेल उप तालुकाप्रमुख जगदीश मते, ग्रामपंचायत सदस्य संतोष लबडे, सदस्य रघुनाथ सोनवणे, युवा नेते अविनाश मांडे, पांडुरंग पाटील व आदिवासी बांधव उपस्थित होते.