दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या आखाडा तापण्याआधीच दिल्लीच्या राजकारणाला हादरावून सोडणारी बातमी समोर आली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अखेर ईडीने अटक केली आहे. दोन तासांच्या चौकशीनंतर ईडीने केजरीवालांना अटक केली आहे. आतापर्यंत त्यांना 10 समन्स बजावले होते, पण त्यांनी त्याला उत्तरं दिली नाही. अखेरीस अटक करण्यात आली आहे.
दारू घोटाळ्याप्रकरणी ईडीने अरविंद केजरीवाल यांना आज दहावा समन्स बजावला होता. ईडीचे सहा ते सात अधिकारी केजरीवाल यांच्या घरी पोहोचले होते. त्यांनी केजरीवाल यांना समन्स जारी केलं होतं. आतापर्यंत दारू घोटाळ्याप्रकारांनी ईडी कडून 8 समन्स देण्यात आले होते. पण केजरीवाल यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. अखेरीस ईडीने केजरीवालांना अटक केली आहे. दरम्यान, केजरीवाल यांना अटक होऊ नये म्हणून तातडीने आम आदमी पार्टीच्या नेत्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली आहे. अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात येवू नये अशी मागणी याचिकेत सुप्रीम कोर्टात करण्यात येणार आहे. या प्रकरणावर तातडीने सुनावणी घेण्यात यावी यासाठी आपकडून प्रयत्न सुरू आहे.