अब की बार रायगड लोकसभेमधून कोण होणार हद्दपार? एकच चर्चा
गौतम जाधव
इंदापूर : ३२ रायगड लोकसभा मतदारसंघात सध्या उमेदवारांच्या निवडणूकीच्या प्रचाराचे वारे जोरदार वाहत असून या ३२ रायगड लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार खा. सुनील तटकरे हे लोकसभेसाठी रत्नागिरी-रायगडमधून महायुतीकडून उभे असून त्यांच्या विरोधात माजी खासदार अनंत गीते हे महाविकास आघाडीचे उमेदवार उभे असून तिसरा उमेदवार ह्या वंचित बहुजन अघाडीच्या कुमुदिनी चव्हाण रिंगणात असूनही रायगड लोकसभेसाठी खरी लढत ही सुनील तटकरे विरूद्ध अनंत गीते अशीच होताना दिसणार आहे. या तिघांपैकी मुस्लिम, बौध्द, आदिवासी, बहुजन समाजाची निर्णायक मते ज्याच्या पारड्यात पडतील तोच या रायगडचा २०२४ चा खासदार ठरणार असल्याने अब की बार ३२ रायगड मतदार संघातून कोण होणार हद्दपार याविषयी चर्चा रंगताना दिसत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट व शिवसेना पक्षाचे दोन गट झाल्याने मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी दिसून येत असून खा. सुनील तटकरे हे यावेळी मोदी बॅनरखाली ३२ रायगड लोकसभेची निवडणूक लढत असल्यामुळे मुस्लिम, बौध्द, आदिवासी समाज हा खा. सुनील तटकरेंवर मोठ्या प्रमाणात नाराज असून तो पूर्वीप्रमाणे तटकरेंना मतदान करणार नाही अशी देखील चर्चा ही ऐकण्यास मिळत असून अनंत गीते हे महाविकास आघाडीचे उमेदवार असून ते उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेतून पुन्हा ३२ रायगड लोकसभेची निवडणूक लढत असून यावेळी त्यांना काँग्रेसचे पक्षाचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी, जेष्ठ नेते शरद पवार, शेकापचे जयंत पाटील, ज्येष्ठ समाजसेविका उल्काताई महाजन या विचारवंत ज्येष्ठ नेत्यांचा पाठिंबा असल्याने त्यांचे मताचे पारडे जड दिसत आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार कुमुदिनी चव्हाण यांना देखील बहुजन समाजातुन वाढता पाठिंबा मिळताना दिसत असून यावेळी मुस्लिम, बौध्द, आदिवासी, बहुजन समाजाच्या मतांचा कौल हा लोकसभेसाठी उभ्या असलेल्या तीन उमेदवारांपैकी ज्याला पडेल तोच खऱ्या आर्थाने या रायगडचा खासदार ठरणार आहे.