विनायक पाटील
पेण : अखिल भारतीय आगरी समाजिक संस्थेच्या ७व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित सामाजिक विषयांवरील खुल्या वक्तृत्व स्पर्धेत नियती पाटील गडब-पेण हिने प्रथम क्रमांक पटकावला. तिला पी. वाय. पाटील यांच्यातर्फे रोख रक्कम ५ हजार आणि आल्हाद पाटील यांच्याकडून स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, पुष्पगुच्छ देण्यात आले.
व्दितीय क्रमांक जोसरांजन-मुरुड येथील वर्षाली ठाकूर हिने पटकावला. तिला गणेश जनार्दन पाटील यांच्यातर्फे रोख रक्कम ३०००/- तर आल्हाद पाटील यांच्याकडून स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि पुष्पगुच्छ देण्यात आले. तृतीय क्रमांकाचे बक्षीस कांदळेपाडा येथील आर्चित भोईर यांनी पटकावले. त्यास रवींद्र कृष्णाजी म्हात्रे यांच्यातर्फे रोख रक्कम २०००/- तर आल्हाद पाटील यांच्याकडून स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि पुष्पगुच्छ देण्यात आले. उत्तेजनार्थ बक्षीस तरशेत-पेण येथील टिळक खाडे यांनी पटकावला. त्यास ॲड. निलेश मोतीराम पाटील यांच्यातर्फे रोख रक्कम १०००/- तर आल्हाद पाटील यांच्याकडून स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि पुष्पगुच्छ देण्यात आले. वाशी येथील हेमंत पाटील यांनाही उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले त्यांना ॲड. निलेश मोतीराम पाटील यांच्यातर्फे रोख रक्कम १०००/- तर आल्हाद पाटील यांच्याकडून स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि पुष्पगुच्छ देण्यात आले.
या स्पर्धेचे परीक्षक म्हणून कवी आणि चित्रकार प्रकाश पाटील, साहित्यिक म. वा. म्हात्रे, कवी एन. जे. पाटील यांनी काम पाहिले. संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष सूर्यकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या वर्धापन दिन सोहळ्याचे उद्घाटन स्टॅंडर्ड चार्टर्ड बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक विनोद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तर प्रमुख पाहुणे म्हणून वीजवितरणचे कार्यकारी अभियंता संजय पाटील, माझगाव डाॅकचे सोशल वेल्फेअर ऑफिसर निलेश बैकर, निवृत्त एक्साईज ऑफिसर सुहास पाटील, रोहा तालुका आगरी समाज संघटनेचे अध्यक्ष हरिश्चंद्र मोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पेण विधानसभा अध्यक्ष नरेंद्र ठाकूर हे उपस्थित होते. कार्याध्यक्ष संजय ठाकूर यांनी प्रास्ताविक केले तर सूत्रसंचालन कवयित्री स्नेहल वर्तक यांनी केले.