आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये कारवाई करण्याची सकल हिंदू समाजाची मागणी
मिलिंद माने
महाड : तालुक्यातील कांबळे तर्फे महाड गावात १८ जून रोजी गोवंश हत्या प्रकारसमोर आला होता. या घटनेच्या निषेधार्थ रायगड जिल्ह्यातल्या सकल हिंदू समाजाने महाड प्रांताधिकारी कार्यालयावर काढलेल्या मोर्चामध्ये संबंधित आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

महाड तालुक्यातील कांबळे तर्फे महाड गावात गोवंश हत्या करणाऱ्यांना विरोध करण्यास गेलेल्या काही हिंदू समाजातील तरुणांना मारहाण झाली होती. याप्रकरणी रायगड जिल्ह्यातल्या सकल हिंदू समाजाने आज महाडमधील चवदार तळे येथून महाडच्या प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून आपला निषेध नोंदविला. या मोर्चात महाड व पोलादपूर तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर हिंदू समाजातील मंडळी तसेच महाडमधील अनेक व्यापारी सामील झाले होते. महाडमधील चवदार तळे येथून या मोर्चाला सुरुवात झाली. या मोर्चामध्ये जय भवानी जय शिवाजी, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विजय असो, जय श्रीराम अशा घोषणा देत गोहत्या करणाऱ्यांचा निषेध करण्यात आला. हा मोर्चा महाडच्या प्रांताधिकारी कार्यालयावर दाखल झाला. या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणावर भगवे ध्वज घेऊन हिंदू समाजातील तरुण पिढी सामील झाली होती. यावेळी महाडचे प्रांताधिकारी ज्ञानोबा बानापुरे यांना लेखी निवेदन सकल हिंदू समाजाच्या वतीने देण्यात आले.

या निवेदनात १) गोवंश हत्या गोवंश तस्करी करणारे तसेच यांना पाठीशी घालणाऱ्या सर्वांना रायगड जिल्ह्यातून कायमस्वरूपी हद्दपार करावे आणि सामाजिक सलोख्याला काळीमा फासणाऱ्या ईशाने कांबळे येथील घटना ही रायगड जिल्ह्यातील शेवटची घटना ठरावी. २) या घटनेच्या गुन्हेगारांवर धार्मिक भावना दुखावल्याबद्दल (भारतीय दंड विधान कलम २९५A, १५३A) कट रचल्याबद्दल (कलम१२०B) वारंवार हीच कृती घडल्याने (कलम ३४) महाराष्ट्र प्राणी रक्षण अधिनियम १९७६ (कलम५, ५C, ९,९A) महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ (MACoCA Atc १९९९) याद्वारे गुन्हेगारास मदत करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. ३) गोवंश हत्या प्रतिबंध कायदा व महाराष्ट्र प्राणी संरक्षण मसुदा कायद्याचे योग्य आभाळ बजावणीसाठी उच्चत्तरीय व परिणामकारक उपाययोजना करणे. ४) यापुढे अशी घटना घडल्यास संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यावर तात्काळ निलंबनाची तरतूद करावी आणि जर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्या स्थानिक प्रशासन जबाबदार असेल. ५) गोमास खरेदी करणाऱ्या वर्गाला याबद्दल होणाऱ्या सामाजिक आणि ची कल्पना देण्याची व्यवस्था प्रशासनाने करावी. ६) अशा अवैध घटना रोखण्यासाठी असमर्थ असणाऱ्या पोलीस पाटील, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक सर्वांची कसून चौकशी करून योग्य ती कारवाई करावी. ७) मागील दोन वर्षात गोवंश हत्या होत असलेल्या ठिकाणी आजपर्यंत प्रशासनाने काय ठोस कारवाई केली? किती लोकांना शिक्षा झाली? वारंवार होणाऱ्या गो तस्करीसाठी कोण जबाबदार आहे? प्रशासनातील कोण कोण यास पाठिंबा देत आहे? काही आर्थिक हितसंबंध या प्रकरणात गुंतले आहेत का? जामिनावर सुटणारे कसाई, नंतर धाक, दडपशाही करतात. किंवा पुन्हा पुन्हा तीच कामे का करतात? जप्त केलेली वाहने यांचे पुढे काय होते? ज्या जागी गो हत्या होत आहे त्या जागा शिल्लक केल्या आहेत का? इमारती पाडल्या आहेत का? या गुन्हेगार कसाही लोकांना कोणती कलमे लावत आहात? हत्या रोखण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला करणाऱ्या मंडळींना आजपर्यंत काय आणि किती शिक्षा झाल्या? अशा मागण्या त्यांनी निवेदनाद्वारे केल्या आहेत. तसेच ईशाने कांबळे येथील व मागील दोन वर्षातील सर्व प्रकरणाची विशेष समिती नेमून किंवा उच्चस्तरीय सखोल चौकशी येत्या एक महिन्यात व्हावी अशी विनंती यावेळी मोर्चाद्वारे आलेल्या सकल हिंदू समाजाने प्रांताधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.