मिलिंद माने
महाड : दि. २७ जून २०२४ रोजी किल्ले रायगड येथे श्रीमंत सकल सौभाग्य संपन्न पुतळाबाई राणीसाहेब यांच्या ३४४व्या पुण्यतिथीनिमित्त गड किल्ले संवर्धन समिती सदस्य आणि शिवपाईक यांच्या वतीने राणीसाहेब यांना अभिवादन करण्यात आले.
मागील १० वर्ष गड किल्ले संवर्धन समिती मार्फत रायगड येथे पुण्यतिथी निमित्त विविध कार्येक्रम घेऊन राणीसाहेब यांना अभिवादन करण्यात येत आहे.
श्रीमंत पुतळाबाई राणीसाहेब २७ जून १६८० रोजी किल्ले रायगड येथे सती गेल्या. शिवाजी राजे यांना महत्वाचा आणि मोठा आधार म्हणजे जिजाऊ आणि त्यांच्यानंतर थोरल्या राणीसाहेब सईबाईंचा मात्र यानंतर शिवाजी राजे यांना जो एकमेव आधार वाटत होता तो म्हणजे श्रीमंत सकल सौभाग्य संपन्न पुतळाबाई राणीसाहेब यांचा शंभूराजांची पोटच्या मुलाप्रमाणे जडणघडण केली. त्यांच्या चांगल्या वाईट प्रसंगात त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिल्या. अशा ममतेच्या महामेरू पुतळाबाई राणीसाहेब शिवाजी राजे यांच्या निधनानंतर स्वराज्याची विस्कळित झालेली फळी सुरळीत बसवून, शंभूराजे यांना छत्रपती झालेले पाहून, आपल्या निस्सीम निष्ठेपायी २७ जून १६८० रोजी किल्ले रायगड येथे जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अंत्यविधी झाला तेथेच राजांचे जोडे सोबत घेऊन सती गेल्या. म्हणुन दरवर्षी २७ जून रोजी गड किल्ले संवर्धन समिती आणि इतर शिवभक्तांच्या माध्यमांतून रायगड येथे पुतळाबाई राणीसाहेब यांना अभिवादन करून त्यांचे पुन:स्मरण करण्यात येते, अशी माहिती इतिहास अभ्यासक प्रसाद दांगट पाटील यांनी दिली.