अनंत नारंगीकर
उरण : शहरातील गजबजलेल्या भाजी व मच्छी मार्केट जवळील धोकादायक गटार सध्या अपघाताला कारणीभूत ठरत आहे. तरी सदर धोकादायक गटाराच्या दुरुस्तीकडे उरण नगरपालिकेने आपले लक्ष केंद्रित करावे अशी मागणी मार्केटमध्ये ये-जा करणारे नागरिक करत आहेत.

उरण शहरातील भाजी व मच्छी मार्केटमध्ये मोठ्या संख्येने रहिवासी हे आपल्या दैनंदिन जीवनातील वस्तू, भाजी व मच्छी खरेदी करण्यासाठी ये-जा करत असतात. सदर मार्केट जवळील रस्त्यावरील गटारांची दुरवस्था झाल्याने त्याचा त्रास हा मार्केटमध्ये ये-जा करणाऱ्या नागरिकांना सहन करावा लागत असून पादचाऱ्यांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. तरी धोकादायक गटाराच्या दुरुस्तीकडे उरण नगरपरिषदेने लक्ष केंद्रित करावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते नरेश भोईर यांनी केली आहे.