विठ्ठल ममताबादे
उरण : नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पात पनवेल तालुक्यातील २७ गावातील घरे व शेतजमीन संपादित झालेली आहे. विमानतळाचे काम जोरात सुरु आहे. परंतु, प्रकल्पग्रसतांच्या पुनर्वसनाचे कामात अदानी समूह प्रकल्पग्रस्तांना त्रास देत आहे. या त्रासाला कंटाळून सर्व प्रकल्पग्रस्त १२ जुलै रोजी ओवेळेखाडीत जलसमाधी आंदोलन करणार आहेत.
प्रकल्पग्रस्तांच्या समस्या संदर्भात शासनदरबारी आवाज पोहोचवण्यासाठी अधिवेशनात लक्षवेधी मांडण्यासाठी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी भेट घेऊन निवेदन दिले व या प्रकरणाची गंभीर दखल घेण्याची विनंती केली.