घन:श्याम कडू
उरण : उरणमधील यशश्री शिंदे हत्याकांड प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणाच्या तपासा दरम्यान नवनवीन ट्विस्ट येत आहेत. यशश्रीच्या हत्येनंतर अटक करण्यात आलेला आरोपी दाऊद शेखची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. आरोपी त्याचा आणि यशश्रीचा मोबाइल कुठे टाकलाय हे पोलिसांना सांगत नाही आहे. पोलिस या दोघांचा मोबाईल शोधत आहे. याप्रकरणामध्ये माबोईल हाच मोठा पुरावा आहे. पण अद्याप पोलिसांना तो सापडला नाही. दाऊद शेखने यशश्रीच्या हत्येनंतर पूरावा नष्ट केल्याचे बोलले जात आहे.
यशश्रीची हत्या केल्यानंतर दाऊद शेख कर्नाटकला फरार झाला होता. पोलिसांनी त्याला गुलबर्ग्यातून अटक केली. पोलिसांनी चौकशी केली असता दाऊदने तिच्या हत्येची कबुली दिली. लग्नाला नकार दिला म्हणून हत्या केल्याचे त्याने सांगितले. याप्रकरणात सगळ्यात मोठा पुरावा म्हणजे दोघांचे मोबाईल आहेत. पण पोलिसांना अद्याप मोबाईल सापडले नाहीत. दाऊद शेखकडे यशश्रीचे काही आक्षेपार्ह फोटो होते. या फोटोवरूनच तो तिला सतत त्रास देत भेटायला येण्यास सांगत होता. आरोपीने तिचे फोटो फेसबुकला टाकल्यामुळे ती त्याला भेटायला गेली. त्यावेळी तिने तो फोटो डिलीट करण्यास सांगितला. त्यानंतर दाऊद तिला लग्न कर असंच बोलत राहिला. यावेळी त्यांच्यात वाद झाले आणि दाऊदने तिची हत्या केली.
यशश्रीची हत्या केल्यानंतर दाऊदने स्वत:चा मोबाईल फॉरमॅट केला. यशश्रीचा मोबाईल त्याने घटनास्थळावरून काही अंतरावर जाऊन फेकून दिला. पोलिस हा मोबाईल शोधत आहेत. दाऊदने या हत्या प्रकरणातला महत्वाचा पुरावाच नष्ट केला असल्याचे बोलले जात आहे. जर दोघांपैकी एकाचा जरी मोबाईल सापडला तरी या प्रकरणातील अनेक महत्वाच्या गोष्टी समोर येऊ शकतात. पोलिस आता सर्व बाजूने याप्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांनी गुरूवारी (१ ऑगस्ट) आरोपीला घटनास्थळावर आणले होते.
दरम्यान, यशश्री शिंदेचा शवविच्छेदन अहवाल बुधवारी समोर आला. या शवविच्छेदन अहवालामधून धक्कादायक माहिती उघड झाली होती. यशश्री शिंदेच्या शरीरावर दोन टॅटू आढळून आले होते. यामधील एक टॅटू आरोपी दाऊद शेखच्या नावाचा होता. यशश्रीने दाऊदचे नाव आपल्या शरीरावर कोरले होते. त्यामुळे आता या प्रकरणाला वेगळे वळण आले आहे. पोलिस आता या बाजूने देखील तपास करत आहेत. यशश्री शिंदेचा मारेकरी दाऊद शेख सध्या तुरुंगात आहे. पोलिस त्याची कसून चौकशी करत आहेत.
आपलंच नाणं खोटं तर वाण्याला दोष देऊन काय का? तिच्या आई – वडील आपले संस्कार देण्यात कमी पडले,… आई वडील….दळभद्री ज्या मुली आई -वडिलांना फसवतात त्यांना कुणा शाफ ची गरज नाही.
मुस्लिम मुली भर उन्हात नी पाऊस बुरखा घालतात, हिंदू मुली त्यात ही मराठी साधं टिळा, टिकली तरी लावतात काय? आपण मुलींना अति सूट देतो त्याचे असेच परिणाम होणार.