मुंबई : राज्याच्या अनेक भागात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना समोर येत आहेत. अशातच मुंबईत भाईंदर स्टेशन पूर्व समोरील बिल्डिंगचा भाग कोसळला आहे. यामध्ये अनेक जण दबल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
घटनास्थळी लोकांची गर्दी जमली आहे. तर या बिल्डिंगचा भाग कोसळला त्याखाली अनेक जण दबल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मुंबईत सलग दोन ते तीन दिवस जोरदार पाऊस सुरु आहे. अशात इमारत खचण्याचा किंवा कोसळण्याचा धोका वाढला आहे.