• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड जिल्ह्यात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य आरोग्य तपासणीला वाहनांअभावी खीळ

ByEditor

Jul 26, 2023

सलीम शेख
माणगाव :
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत शाळांमध्ये होणारी आरोग्य तपासणी गोरगरीब बालकांसाठी संजीवनी ठरत आहे. गेल्या वर्षभरात रायगड जिल्ह्यात सुमारे ४,२२६२४ विद्यार्थ्याच्या आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये हृदयविकार, तर दृष्टिदोष असलेली मुले आढळून आली होती. यंदा जून पासून मुलांच्या आरोग्य तपासणीला सुरुवात करण्याअगोदरच कार्यक्रमांतर्गत रायगड जिल्ह्यातील कंत्राटी पद्धतीने घेण्यात येणारे पथकांची वाहनेच नसल्याने मोहीम रखडली असून त्याला रायगड जिल्ह्यात शालेय आरोग्य तपासणीला खीळ बसलेली दिसत आहे. राज्यस्तरावरून निविदा करून जिल्हा स्तरावर वाहने पुरवली जातात. मात्र राज्य स्तरावरून कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली दिसत नसून रायगड जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील देखील शालेय आरोग्य तपासणी खोळंबलेली आहे.त्यात पावसाळा सुरू असल्याने अनेक साथीचे आजार देखील पसरत असतात. तरी देखील आरोग्य विभाग या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहे का? असा प्रश्न देखील निर्माण होत आहे.

जिल्ह्यात किती पथके कार्यरत

राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत ० ते १८ वयोगटातील मुलांची आरोग्य तपासणी करण्यासाठी जिल्ह्यात ३० पथके स्थापन करण्यात आली आहेत. या प्रत्येक पथकात एक पुरुष व एक महिला असे दोन वैद्यकीय अधिकारी, आरोग्यसेविका व औषधनिर्माता व एक वाहन एक चालक असा समावेश आहे. सध्या 30 पथके कार्यरत आहेत.

या पथकांना तालुका निहाय जिल्हाभरातील शाळा- अंगणवाड्यांमध्ये जाऊन मुलांची आरोग्य तपासणी करण्यासाठी कंत्राटी पद्धतीने वाहने पुरविली जातात. वर्षभरापूर्वीच हा करार संपला होता. मात्र तात्पुरती वाढ मुदत वाढ देऊन आरोग्य तपासणी सुरू होती. मात्र संबंधित वाहन पुरवठादारास भाडे परवडत नसल्यामुळे त्याने कंत्राट बंद केले आहे. तरी देखील एप्रिल, मे या दोन महिन्याचे वाहन धारकांचे बिल दिलेली नाहीत.
आता जून जुलै पासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले. शालेय मुले तसेच अंगणवाड्यातील बालकांच्या आरोग्या तपासणीला जुलै महिन्यात आरोग्य तपासणी सुरू केली जाते. मात्र वाहने उपलब्ध नसल्याने रायगड जिल्ह्यात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाला वाहनांन अभावी खीळ बसलेली दिसत आहे.

३२ व्याधींवर मोफत शस्त्रक्रिया या मोहिमे अंतर्गत मुलांमधील जन्मतः व्याधींचा शोध घेतला जातो. हृदयाला छेद असणे, ओठ टाळू दुभंगणे किंवा सरकणे, जन्मतः श्रवणदोष, दृष्टीदोष, चर्मरोग, रक्ताचा अनेमिया असे विविध ३२ व्याधींवर मोफत शस्त्रक्रिया आणि उपचार केले जातात.
गेल्या वर्षी रायगड जिल्ह्यातील अंगणवाडी ३३४६, अंगणवाडी बालक१५५३६३ , शाळा ३१२१, शाळा विद्यार्थी २६७२७१, किरकोळ दोषी ३५५९५,हृदय शस्त्रक्रिया ५२ , इतर शस्त्रक्रिया ३२४, दृष्टीदोष २९५ , चष्मे वाटप २५२ अशी प्रकारे तपासणी व उपचार करण्यात आले आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!