रायगड जनोदय ऑनलाइन
वाढत्या वयाबरोबर शरीराला अनेक आजार होण्याचा धोका असतो. आता खाण्याच्या चुकीच्या सवयी आणि बिघडलेल्या जीवनशैलीमुळे वयाच्या 35 ते 40 व्या वर्षी शरीरात अनेक समस्या निर्माण होऊ लागतात.
हृदविकारापासून यकृताच्या आजारापर्यंतच्या आजारांचा धोका या वयातच वाढतो. अशा परिस्थितीत शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. जाणून घेऊ वयाच्या 35 ते 40 व्या वर्षी कोणत्या खास गोष्टींची काळजी घ्यावी जेणेकरून तुम्ही निरोगी राहाल.
35 ते 40 या वयात चांगली जीवनशैली आणि नियमित आरोग्य तपासणी करणे आवश्यक असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. वयाच्या 35 ते 40 व्या वर्षी हाडांची ताकद कमी होऊ लागते. प्रजनन क्षमता देखील हळूहळू कमी होऊ लागते आणि हृदयापासून यकृत आणि मूत्रपिंडाच्या आजारांचा धोका वाढतो. यामुळेच या वयात आरोग्याची काळजी घेणे आणि नियमित तपासणी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. याबाबत डॉ. राहुल चौडा यांनी चार महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत.
वयाच्या 35 ते 40 व्या वर्षी या गोष्टी लक्षात ठेवा
या वयात तुम्हाला नियमित तपासणी करणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ कोलेस्ट्रॉल चाचणी आणि हृदयविकाराची लक्षणे असल्यास एक्स-रे आणि इको देखील करणे गरजेचे आहे. या वयात रक्तदाबाचा आजार होण्याचाही धोका असतो. या वयात मधुमेहाचा धोका वाढू लागतो त्यामुळे रक्तातील साखरेची नियमित तपासणी करा. हाडांची घनता कमी होऊ लागते आणि हाड फ्रॅक्चर होण्याचा धोका वाढतो म्हणून कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी ची पातळी तपासणी आवश्यक आहे. जर ते कमी असेल तर यासाठी सूर्यप्रकाशात थोड्यावेळ बसा.
मानसिक आरोग्याची काळजी घेणे गरजेचे
वयाच्या 35 ते 40 व्या वर्षी तणाव आणि चिंता सामान्य आहे परंतु त्यांना योग्य पद्धतीने सामोरे जाणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी दररोज किमान 30 मिनिटे हलका व्यायाम करा जसे की चालणे आणि योगासने करणे. आहारात फास्ट फूड टाळा आणि ताजी फळे, भाज्या, कडधान्य आणि चरबीयुक्त प्रथिनांचे सेवन करा. जर तुम्हाला कोणत्याही आजाराची लक्षणे दिसत असतील तर चाचणी करा. कोणतीही समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
(Disclaimer : वरील सर्व बाबी रायगड जनोदय केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून रायगड जनोदय कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.)