मुंबई ; महाराष्ट्रातील सर्वसामान्य वीज ग्राहकांसाठी एक सुखद बातमी पुढे आली आहे. महावितरणने सादर केलेल्या याचिकेवर राज्य वीज नियामक आयोगाने (MERC) दिलेल्या निर्णयानुसार, वीजदरात टप्प्याटप्प्याने तब्बल 26% कपात करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटद्वारे याबाबतची माहिती देताना सांगितले की, राज्याच्या इतिहासात प्रथमच पहिल्या वर्षीच वीजदरात 10% कपात, आणि पुढील पाच वर्षांत टप्प्याटप्प्याने एकूण 26% दरकपात होणार आहे.
हा निर्णय घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांसाठी दिलासा देणारा ठरणार आहे. विशेषतः दरमहा 100 युनिटपेक्षा कमी वीज वापरणाऱ्यांना याचा सर्वाधिक फायदा मिळणार आहे, जे राज्यातील सुमारे 70% ग्राहकवर्ग आहे.
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अंतर्गत ग्रामीण भागात दिवसा खात्रीशीर वीजपुरवठा सुरू करण्यासाठीही प्रयत्न सुरू असून, हरितऊर्जेवर भर दिल्यामुळे वीजखरेदीचा खर्चही कमी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.