‘डाेंगराची काळी मैना’ या बाेली भाषेतील नावाने ओळखले जाणारे बेरी वर्गीय ‘करवंद’ बाजारपेठेत दाखल झाले आहेत. या फळात उन्हाळ्यात उद्भवणाऱ्या भूक न लागणे, उन्हामुळे शरीरातून घामावाटे क्षार निघून गेल्याने थकवा येणे या सारख्या अनेक समस्यांचे निराकरण करण्याची क्षमता आहे. विशेष करून मधुमेही रुग्णांनी जांभळाचा पर्याय म्हणून ते सेवन करणे उत्तम असल्याचा सल्ला आहारतज्ज्ञ देतात.
सूक्ष्म मिनरल्सचा साठा
उन्हाळ्यात तापमान वाढल्याने प्रत्येकाला भरपूर घाम येताे. या घामावाटे शरीरातील सूक्ष्म मिनरल्स निघून जाऊन थकव्याची समस्या निर्माण हाेते. दरम्यान, विटामिन सी, विटामिन ए, विटामिन असे भरपूर प्रकारचे मिनरल्स करवंदातून मिळतात.
जांभळाला पर्याय करवंद
उन्हाळ्यात प्रामुख्याने गाेड फळ येतात. ती मधुमेह असलेल्यांना खावीशी वाटतात. आंब्याचा सिझन संपल्यानंतर जांभळाचे आगमन हाेते. ते आंब्यावर उतारा म्हणून मधुमेही रुग्ण खातात;परंतु त्यापेक्षाही गुणकारी करवंद आहे. कारण त्यात आंबट तुरट हे गुणधर्म असल्याने ते मधुमेहींसाठी जांभळा एवढेच फायदेकारक आहे असे आहारतज्ज्ञ सांगतात.
करवंद सेवनाने रक्तशुद्धी
-डाॅ. साेनल महाजन,
करवंद हे दुर्मीळ प्रकारातील बेरीवर्गीय फळ आहे. ते उच्च प्रतीचे पित्तशामक आहे. उन्हाळ्यात हाेणारा अॅसिडीटी, भूक न लागणे,पचन न हाेणे या समस्यांवर गुणकारीआहे. अॅसिडचे प्रमाण उन्हाळ्यात वाढत असल्याने अल्काइन म्हणून तेकाम करते. शरीराचे वाढलेले तापमान कमी करते. पाणी पिऊन काेरेडेपणा जाणवताे. या काेरडेपणामुळे एजिंगची समस्या निर्माण हाेते. त्यावर करवंद मात करतात. रक्तशुद्ध अँटी अाॅक्सिडंट, ऊर्जा देण्याचे काम ते करतात.
आहारतज्ज्ञ