मिलिंद माने
मुंबई : कोकणातील गणेशोत्सव अवघ्या एक महिन्यावर येऊन ठेपला असताना मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 ची अवस्था अत्यंत दयनीय झाली असल्याने त्यातच कोकणातील जनता व कोकणातील पत्रकार संघटना मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गासाठी रस्त्यावर उतरून आक्रमक झाल्याने त्याची धास्ती घेऊन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण उद्या पुन्हा एकदा पनवेल ते झाराप पर्यंत पाहणी दौरा करीत आहेत.
कोकणातील चाकरमान्यांचा गणेशोत्सव हा एक महिन्यावर येऊन ठेपला असून 19 सप्टेंबरपासून कोकणात गणेशोत्सवाला प्रारंभ होत आहे. गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणारे चाकरमानी हे मुंबई, गुजरात, ठाणे ,पुणे, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर, भिवंडी व मुंबईतील उपनगरासह वसई, विरार, मिरा रोड, भाईंदर, नालासोपारा, डहाणूपासून लाखोंच्या संख्येने कोकणात गणेशोत्सवासाठी मिळेल त्या वाहनाने जात असतात. कोकणातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यात मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरून हजारो एसटी बसेस तसेच खाजगी वाहने जातात. 19 सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला प्रारंभ होत असला तरी कोकणातील चाकरमानी हे गणेशोत्सवापूर्वी आठ दिवस अगोदर आपापल्या गावी जात असल्यामुळे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची कोंडी होत असते.
कोकणातील गणेशोत्सव हा केवळ महिन्यावर येऊन ठेपला असल्याने कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना दरवर्षाप्रमाणे यावर्षी देखील रस्त्या अभावी मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत असल्याने त्यातच मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर मागील आठवड्यात पत्रकारांनी केलेल्या बोंबाबोंब आंदोलनामुळे तसेच दोन दिवसांपूर्वी सह्याद्री प्रतिष्ठान मार्फत पेण येथे भीक दो आंदोलन केल्याने राज्य सरकार कमालीचे धास्तावले आहे.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 च्या पनवेल ते इंदापूर पर्यंतच्या रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुर्दशा झाल्याने कोकणी जनता प्रचंड संतप्त झाली आहे त्यातच कोकणातील लोकप्रतिनिधी आमदार, खासदार व मंत्री हे मूग गिळून गप्प बसल्याने व त्याबाबत कोणीही बोलण्यास तयार नसल्याने कोकणातील चाकरमानी व जनता प्रचंड हैराण झाली असून या कोकणी जनतेच्या मनाचा कधीही विस्फोट होऊ शकतो व परिस्थिती गंभीर बनू शकते याची कल्पना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना आल्याने तसेच रवींद्र चव्हाण यांचे गाव देखील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असल्याने त्यांना देखील या परिस्थितीची कल्पना असल्याने पुन्हा एकदा मुंबईतील पत्रकारांसमवेत मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 च्या पाहणी दौऱ्याचे आयोजन केले आहे.
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे 15 ऑगस्ट 2023 रोजी पनवेल रायगड येथून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील झारापर्यंत त्यांचा महामार्ग पाहणी दौरा असेल. या दौऱ्यात ते नेमके काय पाहणी करणार आहेत हे उद्याच समजू शकणार आहे. मात्र त्यांच्या पाहणी दौऱ्यामुळे राष्ट्रीय महामार्ग खात्याचे झोपी गेलेले अधिकारी व संबंधित ठेकेदार मात्र खडबडून जागे झाले आहेत.
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 च्या पाहणी दौऱ्या दरम्यान कोकणातील जनतेच्या रोषाला पुन्हा एकदा सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
MUMBAI GOA NH66 IS DIFFICULT & IMPOSSIBLE MISSION FOR ANY GOVERNMENT SINCE LAST 15 YEARS…..
WE CAN NOT EXPECT MUCH FROM THIS VISIT OR ANY THING FROM ANY POLITICAL PARTIES.
ALL ARE COMING UNDER SINGLE ROOF….
जय महाराष्ट्र !
माझे म्हणणे असे आहे की दर वर्षी गणेश उत्सव आला की या सर्वांना जाग येते काय नाटक चालले आहे ते समजत आहे , परंतु जे या समनधीत प्रशासनाला जाग आणून देण्याची क्षमता ठेवतात ते पत्रकार सुद्धा वर्षभर समंदीत विषय काढत नाहीत,
या बद्दल खूप वाईट वाटत आहे. कारण जनतेचा आवाज फक्त पत्रकार च पुढे करू शकतो हे पत्रकारांनी विसरू नये .
अशी विंनंती आहे सर्व पत्रकारांनी असा जोर लावा
की शासन आपल्या दारी आले आहेच पण रस्त्यावर
सुद्धा आले पाहिजे आणि आपला कोकण चा मार्ग चांगला झालाच पाहिजे तो ही गणेश उत्सवा अगोदर……!
धन्यवाद !
राजेंद्र चव्हाण
9136165939