• Thu. Jun 26th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

ग्रामपंचायत निवडणुकांसाठी अर्ज भरण्याच्या वेळेत वाढ

ByEditor

Oct 17, 2023

मुंबई : राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांसाठी उर्वरित कालावधीत म्हणजे २० ऑक्टोबर २०२३ पर्यंत नामनिर्देशनपत्र सादर करण्याची वेळ दुपारी ३ ऐवजी सायंकाळी साडे पाच वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे, असे राज्य निवडणूक आयोगाकडून प्रसिद्धिपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

राज्यभरातील सुमारे २ हजार ३५९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आणि २ हजार ९५० सदस्यपदांच्या; तर १३० सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवणुकांसाठी ०५ नोव्हेंबर २०२३ रोजी मतदान होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयोगाकडून ०३ ऑक्टोबर २०२३ रोजी करण्यात आली होती. त्यानुसार नामनिर्देशनपत्रे १६ ते २० ऑक्टोबर २०२३ या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत दाखल करण्याची मुदत देण्यात आली होती. नामनिर्देशनपत्रासोबत सादर करावयाचे घोषणापत्र संगणक प्रणालीद्वारे भरले जात होते, मात्र त्याची प्रिंट काढतांना तांत्रिक अडचणी येत असल्याच्या तक्रारी आयोगाकडे प्राप्त झाल्या होत्या. त्या अडचणी आता दूर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे नामनिर्देशनपत्र सादर करण्याच्या उर्वरित २० ऑक्टोबर २०२३ या कालावधीतील मुदत सकाळी ११ ते दुपारी ३ ऐवजी आता सकाळी ११ ते सायंकाळी साडे पाच अशी करण्यात आली आहे. अन्य प्रक्रिया पूर्व घोषित कार्यक्रमाप्रमाणे पार पडेल. मतदान ०५ नोव्हेंबर २०२३ रोजी होईल.

ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम

नामनिर्देशनपत्रे दाखल करणे : १६ ते २० ऑक्टोबर २०२३
नामनिर्देशनपत्रांची छाननी : २३ ऑक्टोबर २०२३
नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याचा दिनांक, चिन्ह वाटप : २५ ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत मागे घेता येतील.
मतदान : ५ नोव्हेंबर २०२३ सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल.
मतमोजणी : ०६ नोव्हेंबर २०२३

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!